Congress observers interacted directly with party workers : काँग्रेस निरीक्षकांचा अनोखा प्रयोग, संघटनेवर दिला भर
Yavatmal पक्षामध्ये नेत्यांपेक्षा जास्त महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. नेते सोडून गेले तरी फरक पडत नाही, संघटना टिकली पाहिजे. या भूमिकेतून काँग्रेस निरीक्षकांनी थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नेत्यांना बाजुला ठेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमने-सामने बसवत अडचणी जाणून घेतल्या.
काँग्रेस पक्षाच्या संघटनांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पहिल्यांदाच थेट कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यात आला. प्रदेश काँग्रेसकडून पक्षनिरीक्षक म्हणून आमदार संजय मेश्राम यांना जबाबदारी दिली. आमदार मेश्राम यांनी १५, १६ आणि १७ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १६ ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या दौऱ्याची सुरुवात वणी, पांढरकवडा, झरी, राळेगाव, कळंब येथून झाली. दुसऱ्या दिवशी नेर, बाभूळगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ आणि तिसऱ्या दिवशी पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यांमध्ये काँग्रेसच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांना बोलते करण्यात आले.
Yavatmal Administration : नदी काठावरील गावांमध्ये पाणी टंचाई!
पक्षसंघटनेतील कार्यकर्त्यांची मोट बांधली जात आहे. यासाठी आमदार संजय मेश्राम यांनी जिल्ह्यातील एकाही काँग्रेस नेत्याला त्यांच्या आढावा बैठकीत उपस्थित राहू दिले नाही. केवळ संघटनेतील सदस्य, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची समोरासमोर बैठक घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडून जाणाऱ्यांमुळे कुठलाही फरक पडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार फार कमी मताने पराभूत झाले. आता नव्याने पक्षसंघटन उभे करून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचे आहे. जनसामान्यांच्या विषयाला धरून आंदोलन करायचे आहे, अशाही सूचना आमदार संजय मेश्राम यांनी दिल्या. पक्षात काम करणाऱ्यांना मोठी संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Minister Girish Mahajan : मंत्र्याचे नाव सांगत २८ लाखांनी लुटले!
१६ तालुक्यांमध्ये सलग तीन दिवस कार्यकर्त्यांची भेट घेतली. यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठकीला तालुकाध्यक्ष रमेश भिसनकर, शहर अध्यक्ष बबलू देशमुख, बाजार समिती सभापती रवी ढोक, युवकचे अध्यक्ष प्रमोद बगाडे, साहेबराव खडसे, अजाबराव रणखांब, विक्रम केणे, गुणवंत डोळे, भालचंद्र उईके, गणेश पांडे, अनिल गायकवाड, आशिष महल्ले, श्रेयस वानखडे, सुहास सरगर यांच्यासह शहरातील व तालुक्यातील गावपातळीवर काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते