Maharashtra remembered Sudhir Mungantiwar again : सुधीर मुनगंटीवार यांनी शब्द दिला अन् त्यांच्याच मंत्रिपदाच्या कार्यकाळात पूर्ण केला
Chandrapur : उद्या १ मे, महाराष्ट्र दिन.. विविध आंदोलने झाल्यानंतर १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मागील वर्षापासून होणाऱ्या महाराष्ट्र दिनाचे आणखी एक महत्व आहे, ते म्हणजे राज्याचे तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याला प्रथमच राज्यगीत दिले.
यापुढे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असेल, अशी घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी जानेवारी २०२३ मध्ये केली. कवी राजा बढे लिखित, श्रीनिवास खळे यांनी संगितबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी गायलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..’, या गिताला राज्यगिताचा दर्जा देण्यात आला. शाहीर साबळे यांनी पहाडी आवाजात गायलेल्या या गिताने महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेपासून आजवर मराठी मनावर अधिराज्य गाजवले आहे. हे स्फूर्तिदायक आणि ऊर्जा निर्माण करणारे गीत आहे. त्यामुळे या गिताची राज्यगीत म्हणून निवड केली असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार त्यावेळी म्हणाले होते. हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजे १९ फेब्रुवारी २०२३ रोजी लागू केले गेले.
उद्या १ मे महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे. आज सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री नसले तरी उद्या महाराष्ट्रभर जेव्हा ‘जय जय महाराष्ट्र माझा..’, हे गीत राज्यातील कानाकोपऱ्यांत आबालवृद्धांच्या कानी पडेल, तेव्हा आमदार मुनगंटीवार यांची आठवण नक्कीच काढली जाणार. सोबत आठवले जाईल त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेले ऐतिहासीक कार्य.. मग ते अफजखानाच्या कबरीचे अतिक्रमण काढणे असो की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनच्या संग्रहालयातून भारतात आणणे असो…
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् मूल बसस्थानकावर उपलब्ध झाले शुद्ध, थंड पाणी !
आमदार मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री असताना अथक प्रयत्नांनी आणि कल्पक बुद्धीने वाघनखं जेव्हा महाराष्ट्रात आणली, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संपूर्ण मंत्रीमंडळ आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाचा उर अभिमानाने भरून आला. महाराजांची वाघनखं आणणार, असा शब्द तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता आणि तो त्यांनी त्यांच्याच मंत्रिपदाच्या कार्यकाळात पूर्ण केला, या शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. हे ऐतिहासीक कार्य त्यांच्या हातून घडले, असा उल्लेख अनेक वक्त्यांनी तेव्हा केला, जेव्हा महाराजांची वाघनखं नागपुरातील अजब बंगल्यामध्ये आणली गेली होती.
Sudhir Mungantiwar : शेतमाल विक्रीसाठी मुनगंटीवारांनी उपलब्ध करून दिली बाजार समिती !
देव, देश आणि धर्मासाठी लढून स्वराज्य हितासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो. छत्रपती शिवाजी महाराज या नावातच ऊर्जा आहे, १०० हत्तींचे बळ आहे, शक्ती आहे. महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. हा इतिहास रोमांच उभा करणारा आणि महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या शौर्यवान व बलवान करणारा आहे. म्हणूनच ही वाघनखे स्वराज्य भूमीत आणण्याचा संकल्प केला होता आणि तो पूर्ण झाला, याचे समाधान असल्याचे मुनगंटीवार आजही म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात हे शक्य झाले, असेही आमदार मुनगंटीवार आवर्जून सांगतात.
Clean, beautiful city : स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षीत शहर हीच खरी सेवा !
उद्या महाराष्ट्रदिनी ‘जय जय महाराष्ट्र माझा..’, हे गीत जेव्हा राज्यभरातील जनतेच्या कानांवर पडेल, तेव्हा पुन्हा एकदा या राज्यातील नागरिक महाराष्ट्र प्रेमाने भारावून जाईल, आपल्या राज्याप्रति मनामनांत अभिमान, प्रेम, गर्व पुन्हा एकदा जागृत होईल, तेव्हा माझी आठवण निघो न निघो.. पण हे कार्य करण्याची संधी या महाराष्ट्रानी, माझ्या शिर्षस्थ नेत्यांनी मला दिली आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवला, ‘दिला शब्द केला पूर्ण..’, हे ब्रिद पुन्हा एकदा सत्य ठरवले आणि उद्या राज्यातील प्रत्येक जण ‘जय जय महाराष्ट्र माझा..’, हे गीत गाणार, हीच माझ्या कामाची पावती आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘सत्तावेध’शी बोलताना म्हणाले.