Breaking

Maharashtra Day : जनतेने मेहनतीने महाराष्ट्राला अग्रस्थानी पोहोचवले !

 

Sudhir Mungantiwar said the people made Maharashtra on the forefront : देशाच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के

Chandrapur : महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हाती सुपूर्द केला. १ मे १९६० पासून महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या जनतेने प्रामाणिक मेहनत, अथक परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी पोहोचवले, असे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

महाराष्ट्र दिनी चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभात आमदार मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, तहसीलदार रेणुका कोकाटे, नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, लखनसींग चंदेल, काशी सिंग, रनंजय सिंग, शिवचंद द्विवेदी, बांधकाम विभागाचे येडे, जोशी आदी उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar : इरई नदीसाठी पालकमंत्री उईके आणि मुनगंटीवारांनी दिला आपला पगार !

आमदार मुनगंटीवार म्हणाले, या पवित्र दिनी आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा निर्धार केला पाहिजे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के आहे. हा वाटा प्रयत्न करून आपण वाढवू शकतो. महाराष्ट्र आर्थिक दृष्टा संपन्न आहे. तरीही ग्रामीण आणि शहरांमध्ये काही कुटुंबे हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यामुळे आपण अशा कुटुंबांच्या अडचणी दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् मूल बसस्थानकावर उपलब्ध झाले शुद्ध, थंड पाणी !

आपले बल्लारपूर क्षेत्र प्रगत आहे. कारण येथे आपण अनेक विकासकामे केली आहेत. भविष्यातही बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ आणखी जास्त प्रगत होईल. पण त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. महाराष्ट्रात एक ट्रीलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे आपले स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांनी केला लोकतंत्र सेनानींचा आवाज बुलंद !

सामान्यपणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दोन तालुक्यांसाठी एक एसडीओ कार्यालय असते. पण महाराष्ट्रातील सर्व तहसीलमधून बल्लारपूर ही एकमेव तहसील अशी आहे, जेथे स्वतंत्र एसडीओ कार्यालय आहे आणि हे आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाची बाब असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.