Breaking

Operation Sindoor : लष्कराने स्पष्ट केले ड्रोन हल्ल्याचे कारण !

 

Indian Army explains reason for drone strike : पाकिस्तानकडून पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास सडेतोड उत्तर देणार

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. सैन्याने पाकिस्तानी लष्कर किंवा सामान्य नागरिकांना कुठलेही इजा पोहोचवली नाही. आमचे लक्ष्य केवळ आणि केवळ दहशतवादी आणि त्यांचे अड्डे होते. ही माहिती भारतीय सैन्याने ७ मेच्या हल्ल्यानंतर प्रसारीत केली होती. त्यानंतरही पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले.

आज (८ मे) यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी सोफिया कुरैशी यांनी म्हणाल्या की, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर म्हणून आज भारतीय सैन्याने पाकिस्तानातील शहरांवर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्यात आली आहे.

Operation Sindoor : सामान्यांना इजा न होऊ देता मोडले दहशतवादाचे कंबरडे !

पाकिस्तानने भटींडा, लुधियाना, नाल, फोलेदी, भुज, कपूलथला, अमृतसर, जालंधर, पठाणकोट, जम्मू, श्रीनगर, अवंतीपुरा येथील लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हा हल्ला हाणून पाडला. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याचे अवशेष भारताने जमा करून ठेवले आहेत.

Operation Sindoor : थरार अनुभवणारे पर्यटक म्हणाले, ‘जय हिंद की सेना’!

भारताने आज पाकिस्तानात अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. लाहोरमधील एक हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केली. दरम्यान पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार वाढला आहे. सतत गोळीबार करून तोफगोळे टाकले जात आहेत. या हल्ल्यात भारताचे १६ नागरिक ठार झाले आहेत. भारताकडूनही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले.