Breaking

India – Pakistan : युद्ध थांबले, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती !

War between India and Pakistan has stopped, Ministry of External Affairs informed : भारतीय सैन्याने ५० पेक्षा जास्त ड्रोन पाडले

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानध्ये युद्ध भडकले होते. जोरदार हल्ले – प्रतिहल्ले सुरू होते. मात्र आज (१० मे) सायंकाळी ५ वाजता युद्धविराम झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे काहीसा का होईना तणाव कमी होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. पण पाकिस्तान कुरापाती असल्यामुळे भारतीय लष्कराची यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

काल (९ मे) रात्री पाकिस्ताने भारताकडे आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेसह ड्रोनच्या झुंडीच्या झुंडी पाठवल्या होत्या. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस काऊंटर ड्रोन आपरेशनअंगर्गत ५० पेक्षा जास्त ड्रोन पाडण्यात आले. पण आता युद्धविराम झाल्याची घोषणा करण्यात आली. सायंकाळी ५ वाजतापासून युद्ध थांबले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मीसी यांनी ही माहिती दिलेली आहे.

India – Pakistan War : पाकिस्तानने केलेले सर्व ड्रोन हल्ले भारताने हाणून पाडले !

युद्धविराम झाला, पण खेळ सुरूच..
युद्धविराम झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता दिसत आहे. दोन्ही देशांना युद्धबंदी झाल्याची घोषणा केली आहे. भारताने तर अधिकृतपणे पत्रकार परिषदेमध्ये शस्त्रसंधीची घोषणा केली. वरवर चांगलं वातावरण दिसत असलं तरीही तणाव अजून निवळलेला नाही.

Operation Sindoor : सामान्यांना इजा न होऊ देता मोडले दहशतवादाचे कंबरडे !

सोमवारी होणार निश्चित..
भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये दुपारी फोनवर चर्चा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये युद्ध थांबवण्यावर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवत असल्याचे घोषीत केले. असे असले तरी तणाव पूर्णपणे संपलेला नाही. येत्या सोमवारी (१२ मे) पुन्हा दोन्ही देशांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि युद्धबंदीच्या अटी आणि शर्तींवर चर्चा होणार आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर युद्ध टळेल अन्यथा संघर्ष अटळ आहे.