Administration ordered to immediately conduct heavy rainfall assessments : पालकमंत्र्यांचे निर्देश; तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
Buldhana “मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या शेती, घरे, रस्ते, वीज व जनावरे यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. कार्यालयात बसून नव्हे तर थेट फिल्डवर उतरून कार्यवाही करा,” असा स्पष्ट आदेश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी प्रशासनाला दिला.
राजकीय सजगतेचे दर्शन घडवत पालकमंत्र्यांनी स्थानिक यंत्रणांना वेळ न दवडता संयुक्त सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. “ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांनी समन्वयाने काम करावे आणि पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त जनतेला सरकारी मदतीसाठी वाट पाहावी लागणार नाही, याची दक्षता घ्या,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
Operation Sindoor : ३०० किलोमीटर आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे ?
राज्य सरकारकडून नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आलेली असून, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीच्या प्रकरणांमध्ये तत्काळ पंचनाम्याची तरतूद आहे. याबाबत जिल्ह्यातील प्रशासनाला वेळेवर उपाययोजना करण्याचे आदेश देऊन पालकमंत्र्यांनी शासनाची भूमिका अधोरेखित केली.
Sudhir Mungantiwar : अहिल्यादेवींनी राज्य जिंकण्यासाठी नव्हे तर रयतेचे मन जिंकण्यासाठी कार्य केेले !
राज्यात काही भागांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर “नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, आवश्यक ती दक्षता घ्यावी,” असे आवाहन करत पालकमंत्र्यांनी सरकारच्या संवेदनशीलतेचा पुनरुच्चार केला.