massive crowds celebrate the team’s triumph: आरसीबी संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी
बेंगळुरू : येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आरसीबी या आयपीएल संघाचा विजय साजरा करण्यासाठी मोठी गर्दी झाली. क्रिकेट रसिकांनी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्यामुळे आणि सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत किमान 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून 25 वर लोक जखमी झाले आहेत.
बुधवारी आरसीबीच्या ‘व्हिक्टरी परेड’ दरम्यान बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे किमान 10 जणांचा मृत्यू झाला आणि 25 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
Local body Elections : शरद पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत !
जखमींना बोरिंग आणि व्यादेही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयपीएल संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी व्हिक्टरी परेड चे आयोजन करण्यात आले होते. 18 वर्षा नंतर या संघाला यश मिळाले आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातील रॅली ला प्रशासनाने परवानगी नाकारली होती.
त्यामुळे हा कार्यक्रम स्टेडियम मध्ये ठेवण्यात आला होता. संघाचा विजयासाठी ठेवलेल्या कार्यक्रमात कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर राजकारणी सहभागी झाले होते. पोलीस यंत्रणा त्यांच्या सुरक्षित असल्यामुळे गर्दीकडे दुर्लक्ष झाल्याचाही आरोप होत आहे.
आदल्या दिवशी, गृहमंत्री परमेश्वर राव म्हणाले की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) पुरुष क्रिकेट संघाने 18 वर्षात पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकल्यानंतर विजयाची परेड रॅली होणार नाही. यासाठी पण अतिरिक्त गर्दीचेच कारण सांगण्यात आले होते.
रॅली निघाली असती तर असा प्रकार घडला नसता असे काही जाणकारांचे मत आहे. टी ट्वेंटी चा वीस वर्षाच्या विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईतही मोठी रॅली काढण्यात आली होती मात्र त्यात कोणीही राजकारणी सहभागी झाला नव्हता आणि सुयोग्य नियोजनामुळे तेथे कुठलीही अप्रिय घटना घडली नव्हती.
#RCBvictoryparade #massivecrowds #Stampede #teamstriumph #ChinnaswamyStadium #Bengaluru #आरसीबीविजयीरॅली #आरसीबी#चेंगराचेंगरी