more partners, better for Mva: उद्धव-राज युतीवर सुप्रिया सुळेंचे सूचक वक्तव्य
Mumbai : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात गेल्या काही दिवसापासून मोठी चर्चा सुरू आहे. या विषयावर दररोज नवनवीन चर्चा होत असून कार्यकर्ते एकमेकांना भेटू लागले आहेत यात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य करत जितके अधिक सहकारी तितके महाविकास आघाडी साठी चांगले असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चांना उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच केलेल्या नवीन वक्तव्याने हवा मिळाली. आता थेट बातमीच देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यातून त्यांनी युतीबाबत मोठे संकेत दिल्याचे मानले जात आहे. यावर आता खा. सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हणले आहे की लोकशाहीत कोणाला कुणासोबत जायचे, याचा पूर्ण अधिकार आहे. जितके अधिक सहकारी असतील तितके महाविकास आघाडीसाठी चांगले आहे. एक साथ मिळून महाराष्ट्रासाठी काम करू. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. राज ठाकरे सोबत येत असतील तर आम्हाला कोणतीच अडचण नाही.
Bravery awards and jobs : हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना शौर्य पुरस्कार व नोकरी द्या !
राज्यातील लोकांच्या मनात जे आहे, तेच होणार. आमच्या शिवसैनिकांत संभ्रम नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पण तो संभ्रम नाही. ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. आम्ही आता संदेश नाही थेट बातमीच देणार, असे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या प्रक्रियेबद्दल स्पष्ट केले आणि आपली सकारात्मकता दाखवली.
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणूस, आणि मराठी पुन्हा केंद्रस्थानी येण्याची समीकरणं सुरू आहेत. दोन ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच त्यांचे कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरूवात झाली आहे. यात महाविकास आघाडीविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नवीन राजकीय समीकरणाकडे कसे पाहतात याविषयी वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याबाबत मोठे भाष्य केले. लोकशाहीत कोणाला कुणासोबत जायचे, याचा पूर्ण अधिकार आहे. जितके अधिक सहकारी असतील तितके महाविकास आघाडीसाठी चांगले आहेत. एक साथ मिळून महाराष्ट्रासाठी काम करू. असे सुळे यांनी स्पष्ट केले. आणि महाविकास आघाडी पण राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याला एक प्रकारे पाठिंबा देत महाविकास आघाडीत त्यांना सहभागी करण्याचे आखाडे बांधत आहे असे स्पष्ट केले आहे.
मनसे-सेनेच्या युतीची चर्चा होत असताना उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात जे आहे, तेच होणार. आमच्या शिवसैनिकांत कोणतचा संभ्रम नाही. त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये तो संभ्रम नाही. ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. आम्ही आता संदेश नाही थेट बातमीच देणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दोन्ही ठाकरे सातत्याने युतीविषयी सकारात्मक चर्चा करत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षात युतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार म्हणतात, ‘कर्जमाफीची घोषणा फडणविसांची, आमची नाही’
आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. आम्ही संदेश देणार नाही. आता थेट बातमीच देऊ असे मोठे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी मुंबईसह राज्यातील कार्यकर्त्यांना वाटते. गेल्या एक महिन्यांपासून दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा करत आहे. पण चर्चेचे हे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यावर संजय राऊत तसेच मनसेच्या वतीने संदीप देशपांडे वेगवेगळी विधाने करत रोज विषय मांडत आहेत. मात्र या सगळ्या प्रकारात कोण कोणाला आणि कधी टाळी देणार की पुन्हा दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण फिस्कटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
# MahavikasAghadi #Supriya Sule
#Raj Thackeray #Uddhav Thackera
#sanjay raut #sandeep deshpande
#महाविकास आघाडी #सुप्रिया सुळे #राज ठाकरे #उद्धव ठाकरे #संजय राऊत #संदीप देशपांडे