Breaking

Mumbra local accident : रेल्वेच्या दोन रुळांमधील अंतर तपासणार !

Mumbai Police will check the distance between two railway tracks :मुंबई पोलिस दोन रेल्वे ट्रॅकमधील अंतर तपासणार 

Mumbai : गत सोमवारी (ता. ९ जून) कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील चार प्रवाशांचा मुंब्र्याजवळ मृत्यू झाला. हे चार जण धावत्या रेल्वेतून खाली पडले. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघात कसा झाला, याचा कसून तपास केला जात आहे. लवकरच लोकल ट्रेनमधील अपघाताच्या वेळी तेथे असलेल्या प्रवाशांचाही जबाब घेण्यात येणार आहे. तर दोन रेल्वे रुळांमधील अंतरही मोजले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या अपघातामध्ये एकूण १३ जण जखमी झाले आहेत. यांतील चार जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर कळवा छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे सामान्य रुग्णालय आणि ज्यूपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील चार गंभीर रुग्णांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Harshvardhan sapkal: विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे

अपघात टाळण्यासाठी सरकारचे उपाय..
अशा अपघाताच्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पण खासगी कार्यालयांच्या वेळा बदलवणे सहज शक्य नाही. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या कामावर विपरित परिणाम होतो. तरीही यासंदर्भात पुढील काळात काही निर्णय होणे अपेक्षित आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Local Body Elections : ‘स्थानिक’ निवडणुकांबाबत काय म्हणतात महायुतीचे नेते ?

मुंब्र्याजवळील अपघातामुळे लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. वाढत्या गर्दीमुळे अशा घटना घडतात. घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. मेट्रोचा विस्तार कमी असल्यामुळे लोकलमधील गर्दी वाढली आहे. लोकल रेल्वेला दरवाजे लावले तर व्हेंटीलेशनसाठी वेगळी व्यवस्था करावी लागेल. तरीही दरवाजे असलेल्या वातानुकुलीत रेल्वे भाडे न वाढवता उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.