Breaking

Harshawardhan Sapkal : पाच लाख रुपये देऊन सरकारची जबाबदारी संपत नाही !

Congress questions to BJP Mahayuti government over Kundmala bridge tragedy : कठोर शिक्षा केल्याशिवाय कुणीही गंभीर होणार नाही

Mumbai : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळून झालेल्या अपघातात ५५ पर्यटक वाहून गेले तर चार जण ठार झाले. हा पूल कमकुवत झाला होता, त्याच्यासाठी वर्षभरापूर्वी निधी मंजूर केला होता, असे सरकार आता सांगत आहे. तर मग गेल्या वर्षभरात त्या पुलाचे काम का झाले नाही? सरकार लोकांच्या मरण्याची वाट बघत होते का, असे प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

कुंडमळा येथील इंद्रायणी पूल कोसळ्यावरून सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ते म्हणाले, पुलावर पाटी लावली होती, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण फक्त पाटी लावली म्हणजे जबाबदारी संपली का? की पाटी लाऊन पाट्या टाकण्याचे काम शासन व प्रशासन करत आहे? या दुर्घटनेत ५५ पर्यटक वाहून गेले, त्यांतील अनेकांना वाचवण्यात आले. पण चार जण ठार झाले, तर सहा गंभीर जखमी झाले आहेत, याला जबाबदार कोण, असाही सवाल सपकाळ यांनी केला.

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाने केले मंथन; एकजूट ठेवण्याचे आवाहन

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले म्हणजे सरकारची जबाबदारी संपत नाही. जोपर्यंत दोषींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत कुणीही कामे गांभीर्याने घेणार नाही आणि अशा दुर्घटना होऊन निष्पाप लोक मरतच राहतील. पूल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश दिले आहेत.

MLA Suresh Dhas : अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांवर अनियमिततेचा आरोप

 

सरकारची ही कृती म्हणजे वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार आहे. दुर्घटना होतात, लोक मरतात आणि सरकार मृतांच्या कुटुंबियांच्या तोंडावर काही पैसे फेकून मारून फेकते अन् ‘ये रे माझ्या मागल्या..’, या उक्तीप्रमाणे पुन्हा पुन्हा तेच ते होत राहते, हे दुष्टचक्र आता कुठेतरी थांबले पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.