Breaking

Nana Patole : फक्त सहा महिने झाले, सपकाळांना थोडं काम करू द्या !

It’s only been six months, let Congress state president Harshvardhan Sapkal do some work : ‘स्थानिक’चे निर्णय स्थानिक पातळीवर होतील

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत स्थानिक पातळीवर जे निर्णय होतील, त्यानुसार निवडणुका होतील. आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फक्त सहा महिने झाले. त्यांना थोडं काम करू द्या. काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला.

नागपूर येथे आज (ता. २० जून) पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले म्हणाले, फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर जनतेने कोणताही उत्सव, आनंद साजरा केला नाही. त्यामुळे हे जनतेच्या मनातील सरकार नाही, हे स्पष्ट झालं. निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांची युती आहे, असे आम्ही सातत्याने म्हणत आलो आहे. हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. वाढलेल्या मतांची आकडेवारी आम्ही पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाला मागितली होती. ती अजूनही देण्यात आलेली नाही.

Uddhav Thackeray : ‘त्या’ मंत्र्याला भर रस्त्यात चाबकाने फोडला पाहिजे !

 

मुख्य निवडणूक आयोगाने ३० तारखेला सर्व राज्यांच्या निवडणूक आयोगांना पत्र देऊन सगळे प्रस्ताव नष्ट करण्यास सांगितले होते. मुख्य निवडणूक आयोग म्हणत आहे की, ज्या लोकांचा निवडणुकीशी संबंध नाही, असे लोकही माहिती मागवून त्याचा दुरूपयोग करतात. पण सर्व नागरिकांना सर्व माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाचं पत्र आल्यावर ४८ तासांत सहा मुद्द्यांमध्ये बदल करून केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला दिले.

Parinay Fuke : भाजपने केली आमदार भोंडेकरांची कोंडी !

नियम ९३ का बदलवला ?
मतदानामध्ये फिक्सींग झाली नव्हती, तर मग नियम ९३ का बदलवला. हा नियम बदलवून केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला सर्व अधिकार देण्याचे पाप केले आहे. माहिती लपवण्याचं कारण काय, याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाही. या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असे नाना पटोले म्हणाले.

ZP School : शाळा सुधारावी म्हणून विद्यार्थ्यांचे ‘भीख मांगो’ आंदोलन!

लोकशाहिच्या मार्गाने आंदोलन करण्याची वेळ आली तरी आमची तयारी आहे. पण त्यापूर्वी यासंदर्भात जनजागृती व्हावी, हा आमचा उद्देश आहे. आम्ही दिडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून पळवून लावलं. आज फडणवीस सरकार आल्यावर कुणालाही आनंद झाला नाही. म्हणजे हे जनतेच्या मनातील सरकार नाही, हे स्पष्ट आहे, असेही नाना पटोले म्हणाले.