Breaking

Devendra Fadanvis : महाराष्ट्रात वीज दर तब्बल २६ टक्क्यांनी होणार कमी, पण…

Electricity rates in Maharashtra will be reduced by 26 percent, Mahavitaran has taken the initiative for the first time : महावितरणने प्रथमच वीज दर कमी करण्यासाठी सादर केली याचिका

Mumbai : सातत्याने वाढत्या वीज बिलांमुळे त्रस्त झालेले नागरिक औद्योगिक वापरकर्ते आणि शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्रात विजेचे दर तब्बल २६ टक्क्यांनी कमी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे. पण वीजेचे दर २६ टक्क्यांनी कमी होण्यासाठी वीज ग्राहकांना वाट बघावी लागणार आहे. त्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे.

पूर्वीच्या काळी आणि आत्ताआत्तापर्यंत महावितरण १० टक्के वीज दर वाढ करण्यासाठी याचिका दाखल करत होते. पण राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी करण्यासाठी महावितरणने याचिका दाखल केली आहे. यामध्ये पहिल्या वर्षी १० टक्के वीज दर कमी केले जाणार आहेत. त्यानंतर पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीज कमी करत करत ते २६ टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने MERC हा निकाल महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर दिला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MERC चे कौतुक केले आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अकोला जिल्ह्याला किती फायदा?

MERCच्या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक, अशा तिन्ही वर्गांतील लोकांना होणार आहे. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. शेतकऱ्यांना दिवसा आणि खात्रीचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना २.० चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

CM Devendra Fadnavis : अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी विशेष बैठक

आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे वीज खरेदी खर्चात मोठी बचत होणार आहे. त्यामुळेच हे दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.