Crores of funds are being collected for a program of 40 lakhs : 40 लाखांच्या कार्यक्रमासाठी कोट्यवधीचा निधी केला जातोय गोळा
Akola यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लवकरच होणार आहे. या समारंभाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क वसुली केली जात आहे. कार्यक्रमाला चाळीस लाख रुपयांची गरज आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून वसूल केली जात असलेली रक्कम कोटींच्या घरात पोचली आहे. मुक्त विद्यापीठातील या अनागोंदी कारभाराबाबत राज्यपाल हस्तक्षेप करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांकडून ४५० रुपये शुल्क आकारले जात आहे. एकूण वसुली पाच कोटींहून अधिक होत असल्याचा दावाही केला जात आहे. ही वसुली थांबवावी, अशी मागणी विद्यापीठ विद्वत परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे १४ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
Sanjay Raimulkar Siddharth Kharat : राजकीय वादातून अधिकाऱ्यांना नोटीस!
डॉ. खडक्कार यांच्या निवेदनानुसार, दोन वर्षांपूर्वी शैक्षणिक शुल्कवाढीवरून वाद झाला. त्यानंतर आता दीक्षांत समारंभाच्या नावाखाली वसुली सुरू आहे. २४ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे ४५० रुपये शुल्क राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
विद्यार्थ्यांवर आर्थिक भार
पदवी प्रमाणपत्रामध्ये सुधारणा किंवा दुसरी प्रत मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ६०० रुपये शुल्क भरावे लागते. विद्यापीठासारख्या उच्च शैक्षणिक संस्थेचा नफा मिळवणे हा मुख्य उद्देश नाही. तिच्याकडून असा आर्थिक भार टाकला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
Nagpur Municipal Corporation : नागपुरात होणार स्वच्छता सर्वेक्षण!
अतिरिक्त शुल्काची गरज का?
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बँक ठेवी एक हजार कोटी रुपयांहून अधिक आहेत. अशात अतिरिक्त शुल्क वसुलीची गरज काय आहे, असा प्रश्नही, डॉ. खडक्कार यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांवर आर्थिक भार टाकला जात आहे. हा अन्याय थांबवण्याची आणि दीक्षांत समारंभाच्या नावाखाली होणारी वसुली बंद करण्याची मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.