Breaking

Jaydeep Kawade : कालची दंगल म्हणजे सौहार्दाला सुरंग लावण्याचा प्रयत्न !

 

People’s Republican Party appeals to the state government : निष्पाप नागरिकांसह पोलिस कर्मचाऱ्यांवरही हल्ला

Nagpur : छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रगाढ बुद्धिमत्ता व युद्धकौशल्याच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले. आज विश्वात त्यांची ख्याती आहे. त्यांच्याच पाऊलशात नवीन चेतना निर्माण केली. प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवणाऱ्या छत्रपतींच्या राज्यात आज जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी म्हटले आहे.

सोमवारी (१७ मार्च) नागपुरात औंरगजेबाच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर दोन समुदायांत झालेल्या वादाचे रुपांतर दंगलीत झाले. यात निष्पाप नागरिकांसह पोलिस कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. याशिवाय स्थानिकांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. राजकीय हेतूने राज्याचे वातावरण दुषित करण्याचा घाट घातला जात आहे. धार्मिक तेढ निर्माण करून सौहार्दाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न राज्यात होत असल्याचा आरोप जयदीप कवाडे यांनी केला.

Local Body Elections : प्रशासक काळात तिसरे बजेट!

कवाडे यांनी दंगल घडविणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी नागपुरात झालेल्या हिंसाचारातून याची प्रचिती येत आहे. प्रत्यक्षात काल झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तिव्र निषेध करत असल्याचेही ते म्हणाले.

Sanjay Gandhi Niradhar Yojana : निराधारांना मिळालाच नाही आधार!

धार्मिक तेढ निर्माण करून राज्याच्या सौहार्दाला सुरूंग लावण्याचा कुटील डाव आज विरोधी पक्ष करीत आहे. कोणतेही मुद्दे नसताना नागपुरात दंगली घडवू पाहायला बघत आहे. दंगल घडवून हिंसाचारचे लोन पसरविण्याचा प्रयत्न दगडफेक कारणाऱ्यांनी केलेला सोमवारी नागपुरात आपल्याला पाहायला मिळाला. यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सोसावा लागला. अश्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने दक्षता बाळगण्याची गरज असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.