Guardian Minister Makarand Patil consoled the Kailas Nagare family : शेतीसाठी पाणी हेच खरी श्रद्धांजली
Buldhana : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी ९ एप्रिल रोजी शिवणी आरमाळ येथे जाऊन युवा शेतकरी कै. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आपल्या शेतात सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी २४ मार्च रोजी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.
शासनाने घेतले कुटुंबाचे पालकत्व..
पालकमंत्री पाटील यांनी कुटुंबीयांना आश्वस्त करत सांगितले की, “राज्य शासनाने या कुटुंबाचे पालकत्व घेतले आहे. पालकमंत्री म्हणून मी स्वतः या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
Eknath Shinde : एसटी कर्मचाऱ्यांचे 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार !
१६६० हेक्टर सिंचनासाठी ७० कोटींचा प्रस्ताव..
शेतकऱ्यांच्या पाणी समस्येची दखल घेत शासनाने पुढील पावले उचलली आहेत. खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी धोत्रा नंदईसह १४ गावांपर्यंत बंदिस्त पाईपलाईनद्वारे पोहोचविण्याचा निर्णय. एकूण १६६० हेक्टर सिंचनासाठी ७० कोटींचा प्रस्ताव नियामक मंडळाकडे सादर केला आहे. प्रस्तावाला सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
MLC Sandip Joshi : नागपुरात सुरू होणार पारंपरिक मल्लखांबचे नवे केंद्र !
मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांशी थेट चर्चा..
पालकमंत्री म्हणाले की, “कै. कैलास नागरे यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल आणि ते स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.” या भेटीदरम्यान आमदार मनोज कायंदे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, सरपंच कांताबाई सोनपसारे, उपसरपंच संध्या अरसाळ, तसेच अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.