Breaking

Operation Sindoor : थरार अनुभवणारे पर्यटक म्हणाले, ‘जय हिंद की सेना’!

Tourists celebrate after Air Strike : घटनेच्यावेळी होते काश्मीरमध्ये; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया

Amravati काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईने संपूर्ण देशात दिलासा निर्माण झाला आहे. याच दरम्यान अमरावतीचे ५० पर्यटकांचे पथक काश्मीरमध्ये वास्तव्यास होते. त्यातील काही जणांनी या धोकादायक परिस्थितीचा थरार अनुभवला असून, अमरावतीत परतल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना “आम्ही अक्षरशः जीव मुठीत धरून परतलो” असे म्हटले. भारतीय सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर दिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

१६ एप्रिल रोजी अमरावती, नागपूर, अचलपूर, चंद्रपूर आणि मुंबई येथून आलेल्या २५ जणांच्या समूहाने हमसफर एक्स्प्रेसने जम्मूकडे प्रयाण केले. या पर्यटकांमध्ये दोन वृद्धा, दोन बालके, ११ महिला आणि एक पत्रकार यांचा समावेश होता. १८ व १९ एप्रिल रोजी हे सर्वजण पहलगाम परिसरात होते. त्यांनी अरू व्हॅली, चांदनवाडी, बेताब व्हॅली आणि बैसरनसारख्या निसर्गरम्य स्थळांना भेट दिली.

Operation Sindoor : पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष!

२२ एप्रिलच्या सायंकाळी हल्ल्याच्या बातम्या समजल्या आणि साऱ्यांचे मोबाईल सतर्क झाले. “आम्ही ज्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी होतो, तिथेच पर्यटकांवर हल्ला झाला,” अशी भीतीदायक माहिती समजताच सर्वांचा थरकाप उडाला. श्रीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी रात्री १२च्या सुमारास टेम्पो चालकाचा फोन आला आणि पुढील संकटाची चाहूल लागली. “२३ एप्रिलला जम्मू-काश्मीर बंद आहे, काहीही होऊ शकते,” या वाक्याने पूर्ण समूहात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हल्ल्यानंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाल्यामुळे या समूहाला मुघलमार्गे प्रवास करावा लागला. जवळपास २४५ किमीचा प्रवास करताना त्यांना अनेक अनामिक भीतींना सामोरे जावे लागले. अखेर २४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता ते कटराला पोहोचले आणि सुटकेचा निश्वास टाकला.

Air Strike : काँग्रेसच्या त्या नेत्यावर नेटकऱ्यांचे ‘एअर स्ट्राईक’!

भारतीय लष्कराच्या एअर स्ट्राइकनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर अमरावतीकर पर्यटकांनी “आम्ही सुरक्षित परतलो हीच मोठी गोष्ट,” असे नम्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.