Breaking

Operation Sindoor : ३०० किलोमीटर आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे ?

Congress state president Harshvardhan Sapkal’s barrage of questions on BJP : युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली केला का, भाजपला उत्तरे द्यावीच लागतील

Nanded : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही सरकारने ती सोडली. अचानक युद्धविराम केला. डोनाल्ड ट्रम्पच्या धमक्यांना घाबरून तो केला का? पहलगाममध्ये ३०० किलोमीटर आतमध्ये घुसून अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली आणि परतही गेले. आजपर्यंत ते सापडलेले नाहीत. हे सरकारचे अपयश आहे. हे अतिरेकी परत गेले कसे, याचे उत्तर भाजपला द्यावेच लागणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

नांदेडमध्ये काल काँग्रेसच्यावतीने जय जवान जय किसान जय हिंद रॅली काढण्यात आली. यावेळी सपकाळ बोलत होते. रॅलीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत पाटील जवळगावकर, सुरेश गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Banking sector : बॅंकिंग क्षेत्रातील मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचे काम उटगी करतील !

ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या वीर जवानांनी साहस दाखवले त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे. भारत – पाकिस्तान युद्ध, चीन विरोधातील युद्ध, कारगील युद्ध, १९४८ च्या युद्धातील शहीद, इंदिरा गांधी, राजीव गांधी, महात्मा गांधी व पहलगाममध्ये शहीद झालेले पर्यक या सर्वांना अभिवादन करण्यासाठी ही रॅली आहे. देशाच्या सीमेवर जवान लढत आहेत. तर आपला बळीराजा येथे जमीन कसतो आहे व सर्वांचे पोट भरतो. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेसने या रॅलीचे आयोजन केले असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.