Indira Gandhi imposed Emergency to maintain family power : लोकशाहीला शोभेची वस्तू बनविल्याचा विनय सहस्रबुद्धेंचा आरोप
Nagpur अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी यांनी देशात आपल्या कुटुंबातील सत्ता कायम ठेवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली. आणीबाणीमुळे भारताच्या लोकशाहीवर कलंक लागले, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केला.
आणीबाणीच्या वेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी त्या काळात घाबरलेल्या होत्या, त्यामुळे आपल्या अवतीभवती विश्वासपात्र लोकांना नेमण्याचा त्यांचा प्रयत्न होता. काँग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते, असा आरोपही त्यांनी केला. ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
MLC Sandip Joshi : काँग्रेस विजयी झालेल्या पश्चिम आणि उत्तर नागपुरातही मतदार वाढले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर संघटनांनी आणीबाणीचा विरोध केला. त्यावेळी लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्याबाबत काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले. मागील काही काळापासून राईचा पर्वत करत काही साहित्यिकांकडून सरकार व प्रशासनाविरोधात भूमिका घेण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र आणीबाणीच्या कालावधीत काँग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते. स्वातंत्र्यानंतर देशासमोरील त्या सर्वात कठीण काळात संबंधित साहित्यिक व इतिहासकारांनी मौन का साधले होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
50 Years of Emergency : आणीबाणी सेनानींच्या सत्कारासाठी अधिकारी व्यासपीठावरून खाली आले
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे टीका करताना बहुतांश वेळा निराधार बोलतात. आणीबाणीच्या काळात आम्ही अशी टीका केली असती, तर ती छापलीदेखील गेली नसती. त्यामुळे खरगे यांच्या टीकेला जास्त उत्तर देण्याची गरज नाही. घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले. संविधानाच्या मुद्द्यांवर आमच्यावर विरोधकांकडून तथ्यहीन टीका करण्यात येते. मात्र याचा अर्थ आम्ही बचावात्मक पवित्रा घेतला आहे, असा होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.