Manikrao Kokate : चांगल्या कामगिरीमुळे माणिकराव कोकाटे यांना अभय?

Controversial Agriculture Minister may get a last chance from Ajit Pawar : अजित पवारांकडून ‘अखेरची संधी’ मिळण्याची दाट शक्यता

Mumbai : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशन सुरू असताना ऑनलाइन रमी खेळताना आढळल्यामुळे सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. या प्रकारावरून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोकाटेंना तातडीने राजीनामा घेण्याऐवजी अखेरची संधी देण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून माणिकराव कोकाटे सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. आता सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता वाढली आहे. अशा स्थितीत अजित पवारांनी कोकाटेंशी चर्चा करून, त्यांना वादांपासून दूर राहण्याचा आणि कामगिरीत सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार, अजित पवार कोकाटेंना ‘अखेरची संधी’ देण्याच्या भूमिकेत आहेत.

Hashwardhan Sapkal : कमकुवत गृहमंत्र्यांमुळे राज्यात गुन्हेगारीला उत्तेजन

अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विभागाची कामगिरी सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात उल्लेखनीय ठरली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कार्यप्रदर्शनाच्या यादीत कृषी विभाग पहिल्या पाच क्रमांकात आला आहे. विविध नव्या योजना, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि खर्चावर नियंत्रण या बाबतीत कोकाटे यांचे कार्य सरकारकडून सकारात्मक मानले जात आहे.

विशेष म्हणजे, कोकाटे यांनी आयएएस अधिकारी व्ही. राधा यांना आपल्या विभागात सचिव म्हणून नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे खास विनंती केली होती. राधा या कर्तव्यकठोर आणि भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. अनेक मंत्री त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, मात्र कोकाटेंनी त्यांच्याशी काम करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे कोकाटे यांची प्रशासनात वेगळी छाप असल्याचंही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं.

Devendra Fadnavis : ‘उमेद मॉल’, पंचायतराज अभियानास मान्यता

कोकाटे यांच्या कार्यकाळात 1.2 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 46 हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचा दाव सूत्रांनी केला आहे. कृषी विभागाच्या विविध योजना आणि तंत्रज्ञान वापराच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्या चांगल्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाले असल्याची खंत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचे लक्ष आता केवळ मंत्रालयीन कामगिरीवर न राहता, मंत्र्यांचे वर्तन, वक्तव्ये आणि पक्षाशी असलेले नाते यावर केंद्रित झाले आहे. कोकाटे यांनी या बाबतीत अजित पवारांना दिलेले आश्वासन हे त्यांच्या मंत्रीपदाच्या भवितव्यावर निर्णायक ठरणार आहे.

Ajit Pawar writes letter to Nitin Gadkari : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवा, अजितदादांचे गडकरींना साकडे!

राजकीय पातळीवरही कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार सावध पवित्रा घेत असल्याचे दिसून येत आहे. कोकाटे हे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे विरोधकांच्या दबावाला झुकल्याचा संदेश जाऊ शकतो, असेही पक्षातील काही नेत्यांचे मत आहे. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या वादग्रस्त मंत्र्यांना पाठीशी घालत असताना, अजित पवारांनी कोकाटेंना दूर केल्यास पक्षात गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर अजित पवार कोकाटेंना तात्पुरते अभय देऊ शकतात, पण त्यांच्या संयमाची परीमिती आता ओलांडली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसांत कोकाटे यांच्या वर्तनावर आणि कामगिरीवरून त्यांचे मंत्रीपद टिकेल की नाही, हे निश्चित होणार आहे.