Ajit Pawar death news : २४ तासांत मदतीचा जीआर काढणारा लोकनेता हरवला!

Party workers in Nagpur moved to tears : अजित पवारांची रोखठोक भूमिका अन् प्रशासनावरचा वचक, विदर्भातील कार्यकर्ते गहिवरले

​Nagpur उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे विदर्भातील राजकीय वातावरण सुन्न झाले असून, त्यांच्या ‘रोखठोक’ कार्यपद्धतीची सध्या नागपुरात मोठी चर्चा सुरू आहे. महायुतीत सहभागी झाल्यानंतर दादांनी नागपुरात घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘चिंतन शिबिर’ आजही अनेक नेत्यांच्या स्मरणात आहे. या शिबिरात दादांनी केवळ कार्यकर्त्यांना ऊर्जाच दिली नव्हती, तर बेजबाबदार पालकमंत्र्यांना “खुर्च्या रिकाम्या करा” असा सज्जड दम भरून आपल्या शिस्तप्रिय ‘दादागिरी’चा प्रत्यय दिला होता.

​नागपुरातील चिंतन शिबिरात अजितदादांच्या शिस्तीचा धाक सर्वांनीच अनुभवला होता. शिबिर सुरू झाल्यानंतर उशिरा येणाऱ्या नेत्यांसाठी दादांनी सभागृहाचे दार चक्क बंद करण्याचे आदेश दिले होते. उशिरा पोहोचलेल्या बड्या नेत्यांचीही त्यांनी सर्वांसमोर कानउघडणी केली होती.

 

Will Maratha Reservation Deadlock End? : मराठा आरक्षणाचा पेच सुटणार? जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ‘सातारा गॅझेट’ लागू होण्याची शक्यता


राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जेव्हा पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली, तेव्हा दादांनी तात्काळ कडक भूमिका घेतली. “ज्या पालकमंत्र्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात वेळ देता येत नसेल, त्यांनी पद सोडावे,” असे ठणकावून सांगत त्यांनी प्रत्येक मंत्र्यावर आपली नजर असल्याचा इशारा दिला होता.

​अजित पवारांच्या निधनानंतर विदर्भातील अनेक पदाधिकारी त्यांच्या कामाच्या वेगाबद्दल भावूक झाले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांनी वर्ध्यातील एका घटनेची आठवण करून दिली:
​प्रोटोकॉल तोडला: अतिवृष्टीनंतर वर्ध्यातील एका गावातील महिलांनी दादांना आवाज दिला. सुरक्षारक्षक आणि प्रोटोकॉल बाजूला सारून दादा चिखल तुडवत थेट शेतकऱ्यांच्या झोपडीत गेले.

Ajit Pawar’s Demise Revives Dark Memories : काळ्या आठवणींना उजाळा; हवाई दुर्घटनेत देशाला गमवावे लागले ‘हे’ दिग्गज नेते

​२४ तासांत जीआर: शेतकऱ्यांचे हाल पाहून गहिवरलेल्या दादांनी जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळावरूनच आदेश दिले आणि केवळ २४ तासांच्या आत मदतीचा शासन निर्णय (GR) काढून प्रशासकीय गतीचे उदाहरण घालून दिले.

​सावनेर तालुक्यातील नदीवर बंधाऱ्याची पाहणी करतानाही दादांनी असाच ‘ऑन द स्पॉट’ निर्णय घेतला होता. विदर्भातील सिंचन आणि शेती प्रश्नावर दादांनी कधीही फाईल्स अडवून ठेवल्या नाहीत. प्रशासनावर त्यांचा असलेला वचक हा विदर्भातील विकासकामांना वेग देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला होता.

https://sattavedh.com/sudhir-mungantiwar-mla-sudhir-mungantiwar-emotional-tribute-to-ajit

​चिंतन शिबिरातून त्यांनी स्पष्ट केले होते की, पक्षाचा कार्यकर्ता हाच सर्वात महत्त्वाचा आहे. मुंबईतून पत्र आणून पदाधिकारी होणाऱ्यांपेक्षा जमिनीवर काम करणाऱ्यांना त्यांनी ताकद दिली. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी दादांनी जी रणनीती आखली होती, ती त्यांच्या अचानक जाण्यामुळे अपूर्ण राहिली असल्याची भावना आता कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
​अजितदादांच्या जाण्यामुळे विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ एक नेताच नाही, तर प्रशासनाला धाकात ठेवून काम करून घेणारा एक ‘प्रशासक’ गमावला आहे, असेच चित्र सध्या नागपूरच्या राजकीय वर्तुळात दिसत आहे.