Special Gramsabha across the state on International Women’s Day : महिला व बालविकास विभाग मंत्र्यांची घोषणा; महिला सक्षमीकरणावर होणार चिंतन
Mumbai जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता महिला सक्षमीकरणावर चिंतन करण्यासाठी दरवर्षी महिला दिनाला विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे. बालविवाह होऊ नये यासाठी लोकचळवळ राबविणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहेत, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
Artificial Intellengence in health sector : AI मशीनने काढले ६८ हजार ६२६ ECG!
महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी रहावी. महिलांचे जीवनमान उंचावले गेले पाहिजे. त्यासाठी प्रभावी धोरणे गावपातळीवर अंमलात आले पाहिजे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविले गेले पाहिजे. हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून त्यावर ठोस पावले उचलली जातील.
या विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि नागरिकांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे. महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि मुलभूत हक्कांसाठी लढा देण्याची महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.
Shivbhojan : आघाडी सरकारची ही योजना आजही ठरतेय कष्टकऱ्यांसाठी वरदान!
राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आजच्या काळातही महिलांसाठी न्याय आणि सुरक्षा देणे तसेच प्रत्येक गाव आणि खेड्यापर्यंत महिला व बालकांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून बालविवाह, जाचक विधवा प्रथा, अन्यायकारक अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच मुलींच्या जन्मदर वाढीसाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे.