Breaking

Adv. Prakash Ambedkar : आंबेडकर म्हणाले, राज्यघटनेनुसार कारभार चालला तर…

The country should run according to the constitution : सीताबाई महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेत मांडले विचार

Akola भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य भारतीय राज्यघटना करते. राज्यघटनेतील तत्त्वांनुसार प्रशासन चालवले तर भारत एक समृद्ध राष्ट्र म्हणून ओळखले जाईल, कारण राज्यघटना हा देशाच्या विकासाचा मूलभूत पाया आहे, असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीच्या सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय राज्यघटना : देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया’ या विषयावर एक दिवसीय बहुशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत बीजभाषण करताना अॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते.

Demand of Vidarbh State : विदर्भ राज्यासाठी पुन्हा एल्गार!

अध्यक्षस्थानी बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता होते. यावेळी मानद सचिव डॉ. पवन माहेश्वरी, माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, माजी उपाध्यक्ष डॉ. एन. के. माहेश्वरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची, डॉ. राय, डॉ. जी. जी. गोंडाने, डॉ. आर. डी. चंद्रवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

परिषदेत देशभरातून आलेल्या १७१ संशोधक व प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. हे शोधनिबंध अजिंठा या नामांकित जर्नलमध्ये सहा भागांत प्रकाशित करण्यात आले. परिषदेत आयोजन सचिव डॉ. प्रसन्नजीत गवई, डॉ. भारती पटनायक, डॉ. ज्ञानशील खंडेराव यांचीही उपस्थिती होती.

Tribal Culture : ‘जय सेवा जय जय सेवा’चा गजर; दुमदुमले कचारगड

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आणीबाणीच्या काळातही राज्यघटनेने मूलभूत हक्कांचे संरक्षण केले असल्याचे सांगितले. आजच्या युगात माणसाला सर्व काही मिळवूनही समाधान मिळत नाही, कारण त्याला अधिक मिळवण्याची हाव आहे. आजची तरुण पिढी आत्मकेंद्रीत होत असून, त्यांनी केवळ स्वतःचा विचार न करता समाज व राष्ट्राच्या विकासाकडेही लक्ष द्यायला हवे. राज्यघटनेने दिलेले सार्वभौमत्वच देशाच्या प्रगतीचा खरा पाया आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित मानपत्राचे वाचन केले. अध्यक्षीय भाषणात अॅड. मोतीसिंह मोहता यांनी भारतीय राज्यघटनेमुळे भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशाला एकसंघ ठेवता आल्याचे नमूद केले. आपण सर्वांनी राज्यघटनेनुसार वागले पाहिजे, असे ते म्हणाले.

Session court of Gondia : अल्पवयीन मुलीला चार वर्षांनी न्याय!

प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. कैलास वानखडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्राची काळे व प्रा. सीमा चिमणकर यांनी केले, तर प्रा. दीपाली सोसे व प्रा. समीक्षा तेलगोटे यांनी आभार मानले.