Breaking

Mahayuti Government : दुष्काळ संपला; मंत्रिपदाचा अन् पालकमंत्रिपदाचाही !

After eleven years, Wardha got the guardian minister of own district : कांबळेंनंतर भोयर यांच्या रुपात जिल्ह्यातील नेताच पालकमंत्री

Wardha दहा वर्षांनंतर जिल्ह्याला डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. आता ११ वर्षांनंतर त्यांच्याच रूपाने जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री बनले आहे. रणजित कांबळे यांच्यानंतर भोयर यांच्या रुपात हा योग साधता आला आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे.

डॉ. भोयर यांनी विजयाची हॅटट्रिक साधली होती. मंत्रिमंडळात डॉ. भोयर यांची वर्णी लागली. त्यामुळे तब्बल दहा वर्षांनंतर जिल्ह्याचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपला होता. आता तेच पालकमंत्री झाले आहे. देवळीचे तत्कालीन आमदार रणजित कांबळे यांच्या रूपाने जिल्ह्याला २००४ ते १४ पर्यंत मंत्रिमंडळात स्थान होते. २०१३ ते १४ च्या दरम्यान रणजित कांबळे काही महिन्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते. २०१४ मध्ये सत्तांतर झाले. तेव्हापासून जिल्हा मंत्रिपदापासून वंचित होता. परिणामी बाहेर जिल्ह्यातील मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद होते.

BJP-NCP wins Panchayat Samiti Chairman election : भाजपचाच डंका; राष्ट्रवादीसोबत समीकरण कायम

तब्बल दहा वर्षांनंतर डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने जिल्ह्याला राज्यमंत्रिपद मिळाले होते. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, गृह (ग्रामीण), सहकार, गृहनिर्माण, खनिकर्म आदी विभाग सोपविण्यात आले होते. आता पालकमंत्रिपदही त्यांच्याकडेच सोपविण्यात आले आहे. डॉ. पंकज भोयर यांचे शिक्षण बी.एससी. एम.ए. अर्थशास्त्र, पीएच.डी.पर्यंत झाले आहे. २०१४ पासून ते वर्धेचे आमदार आहेत. तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. त्यांनी नागपूर विद्यापीठाचे हँडबॉलमध्ये राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधित्व केले. हँडबॉलमध्ये ते विद्यापीठाचे कलर होल्डर आहे.

Politics of District Central Cooperative Bank : बँकेत ‘अविश्वास’ मांडणारेच अविश्वासाच्या घेऱ्यात

विधानसभेची २३ नोव्हेंबरला मतमोजणी होती. त्याच दिवशी डॉ. भोयर यांच्या आईचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांना आमदारकी मिळाली. १५ डिसेंबरला त्यांच्या वडिलांचा वाढदिवस होता. त्या दिवशी राज्यमंत्रिपदाची भेट मिळाली. आता त्यांना जिल्ह्याचे पालकत्व मिळाले आहे. राज्यमंत्रिपदासह आता पालकमंत्री म्हणून डॉ. भोयर यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पालकमंत्रिपद आल्याने जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.