From Sanjay Gandhi to Vijay Rupani luminaries lost in plane crash : विमान अपघातात कोणकोणत्या बड्या नेत्यांचा झाला मृत्यू
Mumbai: अहमदाबाद येथे काल दुपारी एअर इंडियाच्या इंग्लडला निघालेल्या आंतरराष्ट्रीय विमानाचा मोठा अपघात झाला. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले. देशात आतापर्यंत झालेल्या अशाच विमान दुर्घटनेत आपण अनेक बडे नेते आणि दिग्गजांना गमावले आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. यापैकी विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील 16 जणांचा समावेश आहे. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला. ते अहमदाबादहून लंडनला त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. दरम्यान, रुपाणी यांच्याआधी विमान अपघातात अनेक बड्या नेत्यांचा देखील मृत्यू झाला आहे
Ahmedabad plane crash : अपघात मेंटेनन्स अभावी की पायलट एरर !
विमान अपघातात मृत्यू झालेल्यामध्ये दिग्जांसोबत बड्या नेत्यांचाहीं समावेश आहे यात देशातील महान शास्त्रज्ञ होमी महांग्री भाभा यांचे पण एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाले. 24 जानेवारी 1966 रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट 101 ला अपघात झाला त्यात त्यांचा समावेश होता.
Ahmedabad Plane Crash : विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश 7 पोर्तुगी 1 कॅनडाचा नागरिक.
इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते संजय गांधी यांचेही विमान अपघातात निधन झाले. ही दुर्घटना 23 जून 1980 रोजी घडली. देशाचे माजी रेल्वेमंत्री माधवराव सिंधिया यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी कानपूर येथे एका राजकीय रॅलीला जात असताना विमान अपघातात निधन झाले होते.
प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे ऊर्जामंत्री ओपी जिंदल आणि कृषीमंत्री सुरेंद्र सिंह 2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरले. त्यांचे किंग कोब्रा हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अपघात झाला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
Plane crash in Ahmedabad : 232 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचेही विमान अपघातात निधन झाले. 2 सप्टेंबर 2009 साली खराब हवामानामुळं त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.b30 एप्रिल 2011 रोजी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांचे पवन हंस हेलिकॉप्टर जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटल्याने अपघातात पडले. पाच दिवसांनंतर, तवांगमध्ये विमानाचा अवशेष सापडले.
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत देखील अशाच अपघाताचे बळी ठरले. 8 डिसेंबर 2021 रोजी सीडीएस विपिन रावत हेलिकॉप्टरने सुलूरमधील वेलिंग्टनला जात होते, त्या दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूर येथे कोसळले. त्यांच्या पत्नी आणि इतर 11 लोकही विमानात होते.
_____