Breaking

Ahmedabad plane crash : अकल्पनीय दुर्घटनेत सर्वच उद्ध्वस्त, करोडो रुपयांचं करायचं काय ?

Everything destroyed in an unimaginable disaster, what to do with crores of rupees : कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्यास ते कुटुंब या मदतीतून सावरू शकते

गुजरातच्या अहमदाबाद विमातळावर झालेल्या विमानाच्या अपघातानंतर संपूर्ण देश सुन्न झाला आहे. अशा दुर्दैवी अपघाताची कुणी कल्पनाही केली नसेल. लंडनसाठी उड्डाण भरलेले बोईंग कंपनीचे विमान काही मिनीाटांत शहरातच एका इमारतीवर कोसळले आणि क्षणांत होत्याचे नव्हते झाले. ही अकल्पनीय घटना घडल्यानंतर त्या २४१ कुटुंबीयांचे सर्वस्व उद्धवस्त झाले आहे.

विमान अपघातातील मृत्यू पावलेले आणि जखमींना मदत देण्यासाठी कायदे आहेत. त्या कायद्यांनुसार मृतांच्या कुटुंबीयांना जवळपास एक – एक कोटी रुपये दिले जातात. जखमींना पाच ते १० लाख रुपयांची मदत केली जाते. खरं तर जिवाची किंमत पैशांमध्ये लावताच येत नाही. पण कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराचा सामना करताना सरकारने किंवा कंपन्यांनी केलेली मदत कामी येते. कुटुंबातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्यास ते कुटुंब या मदतीतून सावरू शकते. या दुःखद प्रसंगात कुटुंबीय भान हरवून बसले आहेत. आमचा व्यक्ती गेला, आता या कोटी रुपयांचे करायचे काय, असा आक्रोश कुुटुंबीय करत आहेत.

Ahamadabad plane crash : संजय गांधी ते माधवराव सिंधीया, विजय रुपाणी सह गमावले हे दिग्गज!

काय आहे भरपाईचा कायदा ? विमान प्रवासात एक छोटीशी चूक शेकडो लोकांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे विमान कंपन्यांसाठी काही नियम तयार करण्यात आलेले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हे नियम वेगवेगळे आहेत. विमान कंपन्या कायद्याला बांधील आहेत. या कायद्यानुसार एका मृताच्या कुटुंबीयाला एक कोटी रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. चूक जर विमान कंपनीची असेल तर ही रक्कम वाढू शकते.

Ahmedabad plane crash : अपघात मेंटेनन्स अभावी की पायलट एरर !

सद्यस्थितीत या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना टाटा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने घोषणा केल्यानुसार प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचा खर्चही कंपनी उचलणार आहे. या अकल्पनीय घटनेत मोठे नुकसान झाले आहे, आम्ही लोकांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही कंपनीने नमूद केले आहे.