The government should not go after popular schemes : तिजोरीवर डल्ला न मारता आधी राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी स्थिर करावी
Mumbai : राज्यावर 8 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. असे असताना सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजीरोवर डल्ला मारण्याचे काम करण्यात आले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यावर ते भाषण करत होते.
सरकार मोठमोठया घोषणा करते. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत नाही. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी स्थिर करायची असेल तर लोकप्रिय योजनांच्या मागे सरकारने जाऊ नये, अशी सूचनाही दानवे यांनी केली. सरकारने निधी वाटपात केलेली असमानता, रखडलेले प्रकल्प यांबाबत मुद्दे मांडत दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर टीकेची झोड उठवली.
सरकारने 6 हजार 486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. त्यातील 2 हजार 133 कोटी रुपयांच्या रक्कमा या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या योजनांसाठी केला असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. पंतप्रधानांच स्वप्नं असलेलं स्किल इंडिया म्हणजेच कौशल्य विभागाच्या योजना या आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं गेल असल्याचे दानवे म्हणाले.
Ambadas Danve : फक्त ८ करारांसाठी दावोसला जायची काय गरज होती ?
जलसंपदा विभागामध्ये 27 हजार कोटी रुपये असताना त्यातून 14 हजार कोटी रुपये सुद्धा खर्च झाले नाहीत. जीवन मिशनच्या जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण अंतर्गत 945 योजना प्रस्तावित असताना त्यासाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तरीही 29 हजार कोटी रुपयांची मागणी असूनही कमी निधीची तरतूद करण्यात आली. सरकारने सरपंचांचे मानधन दुपटीने करण्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या खात्यात पैसे जमा केले नाही.
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच हत्या प्रकरणावरून मराठा समाज आक्रमक
परभणी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
समान शिक्षण हक्क कायदयाअंतर्गत मोफत शिक्षण असताना त्यासाठीची निधी देण्यात आला नाही. सावित्रीबाई फुले यांचं स्मारक सातारा जिल्ह्यात उभारण्यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली. मात्र एक वीटही अद्याप रचली गेली नाही. पोलिसांच्या निवासाचा विषय आजही कायम आहे.
Ambadas Danve : राज्यपालांच्या अभिभाषणाचे अंबादास दानवेंनी केले पोस्टमार्टम !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हर घर छत” ही संकल्पना 2022 साली मांडली होती. तरी अद्याप घरकुल योजनेचे 10 टक्केही काम पूर्ण झाले नाही. इतकेच नव्हे तर लाभार्थ्यांची रक्कमही कमी केली. 4 साखर कारखान्यांनी निधीची मागणी केली. पण मंत्रिमंडळातील एकाच साखर कारखान्याला निधी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
सिडकोने स्वस्तात घर देण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कंत्राटदारांच्या हितासाठी अधिक दर आकारले. विदेशी मद्य योजनेत बदल करून उत्पादन शुल्क कमी केलं. हा घोटाळा ठराविक कंपन्यांनाच्या फायद्यासाठी केला का, असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला.