Breaking

Ambadas Danve : फक्त ८ करारांसाठी दावोसला जायची काय गरज होती ?

 

What was the need to go to Davos for just 8 agreements : अंबादास दानवेंनी केली परकीय गुंतवणुकीतील फसवणुकीची पोलखोल

Mumbai : दावोसमध्ये 54 एकूण करार झाले. त्यातील 31 करार हे राज्यातीलच आहेत. तर 15 उद्योगांशी केलेले करार हे मंत्रालय परिसरातील असलेल्या कंपन्यांसोबतचे आहेत. त्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय होती, असा सवाल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सरकारने परकीय गुंतवणूकीबाबत केलेल्या फसवणूकीची पोलखोल केली.

नाट्य परिषदेच्या आग्रहखातर उद्योग विभागाने विविध मंडळांना उद्योग विभागाचे भूखंड दिले. यावरही दानवेंनी ताशेरे ओढले. ते म्हणाले, या विभागात एकच खिडकी आहे. बाकी खिडक्यात जाण्याची गरज नाही. उद्योग विभागाच्या मंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्या कारभारावर दानवे यांनी टीका केली.

Atul Londhe : भैय्याजी जोशींचा उद्दामपणा, आता शिंदे-पवारांची भूमिका काय?

सरकारची त्रिसूत्री कोलमडली..
लाडका भाऊ योजनेचे मानधन गेल्या 6 महिन्यांपासून रखडले आहे. या योजनेअंतर्गत नाशिक येथील मराठा शिक्षण प्रसारक संघात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा केले गेले. त्यामुळे संबंधित
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली.

एसटी भाडेवाढ कंबरडे मोडणारी..
गडचिरोलीतील स्थानिकांच्या रोजगाराचा विषय, मुंबई पुणे मार्ग आणि सी लिंक येथील कंत्राटदाराची मुदत संपूनही पथकर आकारण्यात येतो. एसटीची भाडेवाढ ही सर्वसामान्य माणसाचं कंबरडे मोडणारी आहे. भाडे तत्वावरील बस खरेदीला स्थगिती दिली असली तरी याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी आकारण्यात येत असलेले जादा कर हे सर्वसामान्यांना त्रास देणारे असल्याचेही ते म्हणाले.

Pravin Darekar : दरेकर म्हणतात, महाराष्ट्रात मराठी व्यवहाराची भाषा झाली पाहिजे!

..तर योजना कागदावरच राहिल..
इथेनॉलचे दर, अंगणवाडी सेविकांचे रखडलेले मानधन, सायबर सुरक्षेचा प्रश्न, क्रीडा संकुलांतील भ्रष्टाचार, चंद्रभागा नदीचे प्रदूषण, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, नष्ट होत असलेली वेताल टेकडी याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. सरकारने जाहीर केलेली नमो ड्रोन दीदी योजनेतून बचतगटांना नाममात्र शुल्क आकारून ड्रोन पूर्णपणे मोफत दिले गेले पाहिजे नाही तर ही योजना कागदावर राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Ambadas Danve : राज्यपालांच्या अभिभाषणाचे अंबादास दानवेंनी केले पोस्टमार्टम !

ढसाळ यांची शैली क्रांतीकारक..
सरकारने 18 महामंडळांची घोषणा केली. मात्र त्यासाठी निधीची तरतूद केली नाही.
कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर आधारित चित्रपटावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने ढसाळ कोण आहेत, असा प्रश्न केला. ढसाळ यांची शैली ही क्रांतीकारक आणि ऊर्जा देणारी आहे, असे असताना अशी मंडळं मराठीला काय न्याय देणार, असा सवालही दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला.