Anil Deshmukh is surprised that police cannot find a Prashant Koratkar. : अनिल देशमुखांनी साधला सरकारवर निशाणा
Nagpur : महाराष्ट्राचं राजकारण सध्या प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीच्या भोवती फिरत आहे. त्याच्या घराला पोलिसांचा पहारा असताना तो फरार झाला. चंद्रपूरला पोलिस मुख्यालयाच्या समोरच्या इमारतीमध्ये तो राहतो काय अन् पोलिस अधिकारी त्याला भेटतो काय? कोरटकरसारखा चिल्लर माणूस सापडत नाही, याबद्दल राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले.
नागपुरात आज (२३ मार्च) पत्रकारांशी बोलताना अनिल देखमुख म्हणाले, प्रशांत कोरटकरला कुणाचं संरक्षण आहे? तो सुरक्षित आहे, तो भारतात आहे की परदेशात गेला, हे कोणी सांगत नाही आहे, त्याचे सत्तेतील अनेक लोकांशी संबंध आहेत. त्यामुळे तो पोलिसांना सापडत नाही, यावर विश्वास बसत नाही. पोलिसांच्या मदतीशिवाय तो इतक दिवस लपून राहू शकत नाही. सरकारने मनात आणले तर एका मिनीटात त्यांच्या मुसक्या आवळल्या जाऊ शकतात. या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांना नागपूर पोलिसांनी सहकार्य करावे.
Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू!
मी राज्याचा गृहमंत्री असतांना सुशांत सिंग रजपूत याने आत्महत्या केली. त्यावेळी बांद्रा पोलिसनी चौकशी केली. मुंबई पोलिसांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट दिला. पण भाजपच्या लोकांनी बिहार निवडणुकीच्या वेळी तेव्हा त्या घटनेचे राजकारण केले. सुशांतच्या वडिलांना तिथं केस टाकायला लावली. यात मुंबई बांद्रा पोलीसनी चौकशी केली होती. त्यानंतर चार वर्षांनी सीबीआयने रिपोर्टर दिला आणि आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे, असे देशमुख म्हणाले.
नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, दिशा सालीयन प्रकरणी बदनाम करण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले. कांदा निर्यातीच्या बाबतीत निर्णयात शुल्क कांद्यावर कमी केले. तसेच संत्रा मोसंबी बंगलादेशला जाते, त्यावरही निर्यात कर कमी केल्यास शेतकर्यांना याचा फायदा होईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
MLA Siddharth Kharat : जलजीवन मिशन योजनेत गैरप्रकार, विधानसभेत गाजला विषय
मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, गोरे काय बोलले मला माहीत नाही. त्या महिलेजवल असं काय होत की, ज्यामुळे एक कोटीचे आमिष देऊन अटक केली. तीचे तोंड बंद करण्यात आले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. नागपूर हिंसाचाराच्या बाबतीत दोषींवर कारवाई व्हावी, पण निर्दोष लोकांवर कारवाई होऊ नये, असेही ते म्हणाले.