Breaking

Anti-Corruption Department : ACB चे सर्वाधिक ट्रॅप नाशिक परिक्षेत्रात !

ACB traps most in Nashik area : ३४ लोकप्रतिनिधी आणि ९१ खासगी दलालांवर गुन्हे दाखल

Amravati : महायुती सरकारच्या काळात सर्वाधिक भ्रष्टाचार बोकाळतोय, असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय. त्यातल्या त्यात महसूल विभाग यात सर्वाधिक आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार नाशिक परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक सापळे रचले आणि यशस्वी केले आहेत.

राज्यात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लातलुचपत प्रतिबंधक विभाग ACB सक्रीय आहे. १ जानेवारी ते २२ मे या कालावधीत विभागाने राज्यभरात एकूण २९९ सापळे रचले. यामध्ये ४३५ लाचखोरांना अटक केली आहे. या प्रकरणांत एकूण १ कोटी १४ लाख १६ हजार ८४५ रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. यातील सुमारे ९० टक्के प्रकरणांत लाच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये लाच मागणीचा पुरावा मिळाल्याने गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Buldhana congress : मोताळा नगरपंचायतीत काँग्रेसला धक्का

या काळात नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक ५७, तर मुंबईत सर्वात कमी १९ ट्रॅप्स यशस्वी झाले. ठाणे ४१, पुणे ५३, नागपूर ३४, अमरावती २७, छत्रपती संभाजी नगर ४६ आणि नांदेडमध्ये २२ ट्रॅप रचण्यात आले. या कारवायांमध्ये वर्ग एकचे ३९, वर्ग दोनचे ५१, वर्ग तीनचे सर्वाधिक २०० आणि वर्ग चारचे २० कर्मचारी लाच घेताना पकडले गेले. याशिवाय ३४ लोकप्रतिनिधी (सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी) आणि ९१ खासगी दलालांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर..
संपूर्ण राज्यात रचण्यात आलेल्या २९९ सापळ्यांपैकी सर्वाधिक ८२ ट्रॅप महसूल विभागातील आहेत. या प्रकरणांत ११९ जणांनी मिळून २४.८९ लाखांची लाच घेतल्याचे आढळले आहे. पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांच्या विरोधात ४३ सापळ्यांतून ५९ जणांना १६.८० लाखांची लाच घेताना पकडले गेले. पंचायत समिती विभागाचे ३१ ट्रॅप लाचखोरीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Manikrao Kokate : कृषीमंत्री कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

अमरावती परिक्षेत्रात ३६ अटकेत..
अमरावती परिक्षेत्रात १ जानेवारी ते २२ मे या कालावधीत एकूण २७ सापळे यशस्वी करण्यात आले. यामध्ये ३६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.