Former Congress Union Minister has faith in RSS : संघाच्या व्यासपीठावरून मांडले आदिवासी समाजाचे प्रश्न
Nagpur काँग्रेसच्या एखाद्या माजी मंत्र्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर येण्याची इतिहासातील दुसरीच घटना घडली. काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अरविंद नेताम गुरुवारी झालेल्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे होते. विशेष म्हणजे आदिवासी समाजाच्या विविध समस्या मांडताना अरविंद नेताम यांनी ‘मी संघाकडे आशेने पाहतो’, असे विधान करून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी नेताम प्रमुख पाहुणे होते. तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व्यासपीठावर होते. अरविंद नेताम यांनी यावेळी आपल्या भाषणातून फक्त आदिवासी समाजाचेच मुद्दे मांडले, हे विशेष. समाजातील समस्या सोडविण्याच्या संदर्भात आपण संघाकडून आशावादी असल्याचे ते म्हणाले.
Rashtriya Swayamsevak Sangh : सरसंघचालक म्हणाले, धर्मांतरणाची बळजबरी ही हिंसाच
इंदिरा गांधी व पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावरून काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, नेताम यांनी राजकीय भाषण टाळले, हे विशेष. त्यांनी धर्मांतरणाच्या मुद्यावर बोट ठेवले.
ते म्हणाले, ‘धर्मांतरण ही आदिवासी समाजासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. आदिवासींना धर्मांतरणाचा सर्वात मोठा धोका आहे व कोणत्याही राज्य शासनाने याला गांभिर्याने घेतलेले नाही. देशात आदिवासी समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. अनेकदा सरकार-प्रशासनासमोर गेल्यावर सुनावणीच होत नाही. त्यामुळेच मी संघाकडेच आशेने पाहतो आहे.’
Akash Fundkar : डीपीसी बैठकीत भाजप-शिवसेना आमदारांमध्ये वादावादी
संघभूमीत येऊन बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. संघाच्या शताब्दी वर्षात येथे येणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. देशाची अखंडता व सामाजिक समरसतेसाठी देशात संघ वगळता कुठल्याही संघटनेने काम केलेले नाही. आदिवासींच्या विकासासाठी संघच पुढाकार घेऊ शकतो, असेही ते म्हणाले. धर्मांतरणविरोधी कायदा झाला पाहिजे, असंही ते म्हणाले. त्याचवेळी संघाने या मोहिमेला गती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दिवंगत राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्यानंतर संघस्थानी येणारे ते काँग्रेसशी संबंधित दुसरे मोठे नेते ठरले.