Eknath Shinde’s Shiv Sena has not given up its claim to the Raigad guardian minister post : मोठं झालं पाहिजे, ही स्पर्धा असणं स्वाभाविक
Nagpur : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामध्ये नवनवे ट्विस्ट येत आहेत. ‘रायगडच्या पालकमंत्रिपदावरचा दावा आम्ही सोडलेला नाही’, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले. पण आता अडीच – अडीच वर्षांसाठी पालकमंत्रिपद वाटून देण्याच्या फॉर्म्यूलॅवर विचार सुरू असल्याची माहिती आहे. पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला तर नंतरचे अडीच वर्ष शिवसेनेला, असे ठरत असल्याचेही सूत्र सांगतात.
यासंदर्भात राज्यमंत्री जयस्वाल यांनी पत्रकारांना सांगितले की, प्रत्येक राजकीय पक्षात मोठ्या पदांसाठी स्पर्धा असतेच अन् ते स्वाभिविकही आहे. परंतु अशा प्रश्नांवर महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसून हा मार्ग काढलेला आहे. पण यासाठी अजूनही वाट बघावी लागणार आहे. तरीही प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे. राज्यमंत्रिपदाबाबत विचारले असता, ज्याच्यात क्षमता आहे, तो काम करत असतो. मी राज्यमंत्री म्हणून काम करतो आहे. विविध विभागांचा आढावा घेतो. या पदाला जे अधिकार आहेत, ते परिपूर्ण आहेत.
MLA Amol Mitkari : लक्ष्मण हाकेंची औकात नाही अजित पवारांवर टीका करण्याची
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवाव्या, अशी माझी भावना आहे. कार्यकर्ते काही ठिकाणी वैयक्तिक मेहनत करत असतात त्यांच्या स्वतःच्या भावना असतात. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतही होऊ शकते, असे जयस्वाल यांनी सांगितले. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात, त्यासाठी पांदण रस्त्यांची गरज असते. यासाठी पालकमंत्री पांदण रस्ते योजना सुरू केली होती. आता नव्याने बळीराजा शेत पांदण रस्ते योजना तयार करून दिलेली असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.