Former MLA alleges Congress has a secret alliance with BJP : दबावतंत्र व सूड घेण्याचा प्रकार असल्याचा बच्चू कडू यांचा आरोप
Amravati काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी निर्णयाला स्थगिती हा सत्याचा विजय असल्याचंही म्हटलं.
एका न्यायालयीन प्रकरणात शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतरही विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा बँकेत अपात्र असल्याचा निर्णय दिला. १३ मे रोजीचे आदेश तब्बल महिनाभर दडवून ठेवले, हा षडयंत्राचा भाग आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, हा सत्याचा लढा असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
MLC Sandip Joshi : काँग्रेस विजयी झालेल्या पश्चिम आणि उत्तर नागपुरातही मतदार वाढले
विशेष म्हणजे १३ मे २०२५ रोजी विभागीय सहनिबंधकांनी सरकारी वकिलांना याबाबत मार्गदर्शन मागितले होते व त्याच दिवशी अपात्रतेचा निर्णय दिला. याबाबतचे आदेश महिनाभर दडवून ठेवले. हे आदेश अद्यापही अप्राप्त आहे. ही तानाशाहीची हद्द आहे. दबावतंत्र व सूड घेण्याचा हा प्रकार आहे. मात्र आपण कधी दबाव घेत नाही. भाजपची काही मंडळी बँकेची बदनामी करतात. प्रत्यक्षात बँक यंदा ९० कोटींनी नफ्यात असल्याचे कडू म्हणाले.
आम्ही कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली, कामकाजात संगणकीय सुविधा उपलब्ध केल्या, त्यामुळे किमान काँग्रेसच्या बँक संचालकांनी तरी बँकेची बदनामी करू नये. आंदोलन थांबेल, बच्चू कडू शरणागती घेईल. अशी स्वप्नं काहींनी पाहिली. परंतु मागे हटणाऱ्यांपैकी आपण नसल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे, संचालक नरेशचंद्र ठाकरे यासह अनेक संचालक उपस्थित होते.
50 Years of Emergency : आणीबाणी सेनानींच्या सत्कारासाठी अधिकारी व्यासपीठावरून खाली आले
मंत्रालयात स्कॅन केल्याशिवाय प्रवेश नाही आणि इथे फोन करून अधिकाऱ्यांवर दबाब आणला जातो. महिनाभर आदेश दडविले जातात. त्यांचे ऐकणाऱ्यांना आता दणका दिल्याशिवाय राहणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले. शेतकरी हितासाठी बँक बांधील आहे. जिल्ह्यात सध्या जे कर्जवाटप झाले. त्यामध्ये ८० टक्के वाटा जिल्हा बँकेचा आहे. बच्चू कडू शेतकरी, दिव्यांगांसाठी झटत असल्याने शासनावर दबाव आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून काढण्याचे हे कटकारस्थान असल्याचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे म्हणाले.