Breaking

Bacchu Kadu : बच्चू कडू आयसीयूमध्ये दाखल; प्रकृती स्थिर

Increased ketones have adverse effects on the heart and kidneys : किटॉन्स वाढल्यामुळे हार्ट, किडनीवर विपरित परिणाम

Amravati बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. मात्र मागील सात दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्न नसल्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यामुळे त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूत दाखल केले आहे. दरम्यान, त्यांच्या शरीरात किटॉन्स बॉडी आढळल्या आहेत. किटॉन्स बॉडीमुळे हार्ट आणि किडनीवर विपरीत परिणाम होतो. सोबतच त्यांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यांना उलट्यांचाही त्रास होत आहे. सध्या त्यांची प्रकृती ‘स्टेबल’ आहे. मात्र चोवीस तासांच्या औषधोपचारानंतर समोरील उपचाराची दिशा ठरवली जाईल.

शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच दिव्यांग बांधवांच्या मानधन वाढीसह इतर महत्वाच्या मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन शनिवार, १४ जूनला सातव्या दिवशी तूर्तास थांबले. पाऊस सुरू होणार आहे, त्यामुळे पेरण्या कराव्या लागतील, अशावेळी माझे शेतकरी बांधव याठिकाणी अडकून राहू नये तसेच तुम्ही आता अन्नत्याग आंदोलन सोडले नाही तर आम्ही कुटुंबासह आत्महत्या करू, असे सुमारे दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांचे मेसेज आले.

Bhaskar Jadhav : राज-उद्धव एकत्र येऊ नये यासाठी भाजपची धडपड

या प्रमुख कारणांमुळे आपण आंदोलन स्थगित करत आहे. मात्र शासनाने २ ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगितली नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन करून थेट मंत्रालयात घुसू, अशा इशारा आंदोलन स्थगित करताना बच्चू कडू यांनी दिला आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी प्रकृती सुधारताच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

Kedarnath helicopter accident : केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघातात वणीतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू

येणाऱ्या काळात २ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात जाणार आणि शेतकऱ्यांना भेटणार. कारण मंत्रालयात मोठ्या संख्येत शेतकरी सोबत राहणार आहे. या आंदोलनादरम्यान पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून सर्व शेतकरी म्हणून एकत्र आले, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.