Breaking

Bacchu Kadu : बच्चू कडू पुन्हा उगारणार आंदोलनास्त्र; ५ जुलैपासून एल्गार

Protest against forced debt collection : ‘सातबारा कोरा करा’; सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात यात्रा

Amravati शासनाच्या धोरणांमध्ये सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांसाठी माजी आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उगारणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात ‘सातबारा कोरा करा’ ही १३८ किलोमीटरची पदयात्रा ५ जुलैपासून सुरू होणार आहे.

शेतकऱ्यांना जोपर्यंत सरकार न्याय देत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिला. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून यात्रेला प्रारंभ होणार आहे. चिलगव्हाण (साहेबराव करपे — शेतकरी आत्महत्येचे पहिले प्रकरण जिथे घडले) येथे यात्रेचा समारोप होणार आहे. उंबरडा बाजार, बोदेगाव, दारव्हा, तिवरी, तूपटाकळी, काळी दौलत, गुंज आदी प्रमुख ठिकाणांवरून ही यात्रा मार्गक्रमण करेल. एकूण सात दिवसांत ही यात्रा १३८ किलोमीटर अंतर पार करेल.

Bacchu Kadu : बच्चू कडूंना दिलासा नाहीच; अध्यक्षपदाच्या अपात्रतेवरील निर्णय २४ जूनला

ही यात्रा केवळ एका राजकीय व्यक्तीची नसून, ती शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठीची लोकचळवळ आहे. सक्तीची कर्जवसुली थांबवणे आणि तात्काळ कर्जमाफी लागू करणे या प्रमुख मागण्यांवर ही यात्रा केंद्रित असणार आहे. प्रत्येक ठिकाणी सभा, संवाद व स्थानिक अडचणी समजून घेण्यासाठी थांबे घेतले जाणार आहेत.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या अपात्रेच्या याचिकेवरील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

यात्रेदरम्यान पुढील मागण्या मांडण्यात येणार आहेत:

शेतकरी आत्महत्यांना आळा घालणारी प्रभावी धोरणे लागू करावीत.
विधवा व अपंगांसाठी रोजगार व सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.
मनरेगा अंतर्गत पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कामांचा समावेश करून मजुरीत वाढ करावी.
बेरोजगार तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात.