Breaking

Bhaskar Jadhav : राज-उद्धव एकत्र येऊ नये यासाठी भाजपची धडपड

BJP trying to prevent Raj-Uddhav from coming together : ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान; नागपूर भेटीत संघावर टीका

Nagpur उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येऊ नये, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल, याचा विचार भाजप करत आहे, अशी टीका उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून ते नागपुरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आले होते.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मतं या दोन भावांना मिळतील. एका सर्वेक्षणातून हे पुढे आलं आहे. त्यामुळे भाजप घाबरलेली आहे, असेही जाधव म्हणाले. विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांबद्दल अफवा पसरवणे आणि भाजपबद्दल लोकांचे प्रेम किती वाढले, असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपला लागला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Bhaskar Jadhav : निवडणूक लढा, पण पक्षाकडून खर्च मिळणार नाही!

वेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे झाली. मात्र, त्यानंतरही त्यांच्या विचारधारेवरील नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी ते उभे करू शकले नाही, हा त्यांचा पराभव आहे, अशी टीका जाधव यांनी केली.

Balasaheb thorat : आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक, राजकीय कर्तव्य

संघ हा नेहमी भाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की राम मंदिर बांधायचे असो, सर्वपक्षाकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचे. राम मंदिराच्या उभारणीत सगळ्या धर्माच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली. मुस्लीम धर्मीयांकडूनसुद्धा वर्गणी गोळा केली. निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा आहे. ही दुहेरी नीती आता लोकांच्या लक्षात यायला लागली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.