BJP helping NCP Ajit Pawar in Akola : जिल्हा बँकेतील पीक कर्ज पुनर्गठन घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात
Akola अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पीक कर्ज पुनर्गठन घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात आली असतानाच, भाजप आमदार रणधीर सावरकर MLA Randhir Sawarkar यांनी जिल्हा बँकेचे पुनर्गठन नियमानुसारच झाले असल्याचा दावा करून चर्चेला नवा आयाम दिला आहे. यामुळे महायुती सरकारच्या अंतर्गत राष्ट्रवादी शरद पवार sharad Pawar गटाला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपच्या अंतर्गत वर्तुळात होत आहे.
गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार अमोल मिटकरी यांनी ही बाब विधान परिषदेत उपस्थित करत, संचालक मंडळावर कारवाईची मागणी केली होती. त्यावर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तपासाचे आदेश दिले होते. डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अकरा अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली असून लवकरच अहवाल सादर होणार आहे.
Sunil Tatkare : आमदार संग्राम जगतापांनंतर संग्राम कोते पाटलांनाही तटकरेंकडून ‘खो’ !
या प्रकरणात २,३६७ अकोल्यातील व १,३३० वाशिममधील – एकूण ३,६०० शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. परिणामी, २०१९ मध्ये घोषित केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा संपूर्ण लाभ त्यांना मिळू शकला नाही. केवळ एका हप्त्याची सवलत मिळाल्यामुळे त्यांचे २२ कोटी रुपयांचे कर्ज व्याजासह ५१ कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे हे शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून कर्जासाठी पात्र ठरत नाहीत.
दरम्यान, अकोला जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सावरकर यांनी बँकेचे कर्ज पुनर्गठन नियमानुसार झाले असल्याचा दावा केला. पालकमंत्री आकाश फुंडकर यांनीही बँकेचे कौतुक करत थकीत रक्कम शासनाकडे प्रलंबित असल्याचे नमूद केले.
Raj and Uddhav Thackeray : अस्तित्व टिकवायसाठी एकत्र यावंच लागेल, शत्रुचा शत्रू मित्र !
हे वक्तव्य सुरू असतानाच, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नियंत्रणातील बँकेचे बळकटीकरण सुरू असल्याची कुजबुज भाजपमधून ऐकू येत आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्याची वेगळी बँक केव्हा निर्माण होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.