Breaking

Bravery awards and jobs : हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना शौर्य पुरस्कार व नोकरी द्या !

 

Supriya Sule demands bravery awards and jobs for the families of those killed in the terrorist attack : निष्पाप नागरिकांना ठार मारून दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली

Mumbai : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. या घटनेमुळे देशभरात दुःख आणि संताप आहे. या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांनी धिरोदात्तपणे परिस्थितीचा सामना केल्या. त्यामुळे त्यांना नागरी शौर्य पुरस्कार आणि कुटंबातील एका सदस्याला सरकारने शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

मुंबईत काल (२८ एप्रिल) सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात डोंबीवलीतील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने, पनवेलमध्ये राहणारे दिलीप देसले, पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जदगाळे मरण पावले. हा आपल्या भारत देशावर झालेला हल्ला आहे. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे लोक एकजुट झाले आहेत. आम्ही सर्व एक देश म्हणून भारत सरकारच्या सोबत आहोत.

Supriya Sule : सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला !

या घटनेची बातमी ऐकूनच अंगाचा थरकाप उडाला. घटनेच्या वेळी तेथे असलेल्या लोकांच्या मानसीक स्थितीचा अंदाजही न लावलेला बरा. लोकांना एक – एक करून मारत असताना त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली असेल, याचा विचार करूनही अंगावर काटा उभा राहतो. मरण पावलेल्या कुटुंबीयांनी या प्रसंगाचा धिराने सामना केला. या घटनेनंतर त्यांनी दाखवलेली हिंमत मोठी आहे. जिवाभावाची माणसं मारली जात असताना अशी हिंमत दाखवणे सोपे नाही. म्हणून या सहा जणांच्या कुटुंबीयांना १ मे महाराष्ट्र दिनी नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.