Breaking

Budget Session 2025 : विधानसभेत माईक बंद पडले, अन् कामकाज खोळंबले!

Rohit Pawar said, there was a mess in Halfkin, the same happened in ‘Speaker’ too : रोहित पवार म्हणाले, हाफकिनमध्ये गडबड झाली, तशीच ‘स्पीकर’मध्येही झाली

Mumbai : हाफकिन कंपनीकडून राज्यातील रुग्णालयांना औषधी आणि उपकरणे पुरवण्यात येत होती. पण हाफकिनच्या कामकाजात बरेच गैरव्यवहार झाल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान या प्रश्नावर बोलायला आमदार रोहित पवार उभे झाले. अन् तेवढ्यातच माईक – स्पीकर्समध्ये बिघाड आला. स्पीकर्स दोन मिनीटांसाठी बंद पडले. तेव्हा हाफकिनमध्ये जशी गडबड झाली, तशीच गडबड स्पीकरमध्ये झाली, असा मिश्कील टोला रोहित पवार यांनी लगावला.

प्रश्नोत्तराच्या तासात या प्रश्नाला उत्तर देत असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, हाफकिनमध्ये उशीरा खरेदी होती. त्यामुळे यासाठी नंतर वस्तू प्राधिकरण नेमण्यात आले. त्यांच्यामार्फत खरेदी करून राज्यातील रुग्णालयांना औषधी आणि उपकरणांचा पुरवठा करण्यात येतो. वस्तू प्राधिकरणाला २०२३ पासून २०२३-२४ ला १०३.५९ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यापैकी त्यांनी ७५ कोटी खर्च केला. २८ कोटीचे टेंडर काढले. २०२४-२५ ला ११२ कोटी दिले. त्यापैकी ६ कोटी ४४ लाख रुपयांची खरेदी करण्यात आली. प्राधिकरणाने खरेदी व्यवस्थित केली आहे. त्यामुळे आज कुठेही औषधांची कमतरता नाही.

Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांचा पाठपुरावा अन् चंद्रपूरच्या शिक्षण क्षेत्राला मिळणार नवी दिशा !

रोहित पवार म्हणाले, हाफकिनमध्ये जी उशीरा खरेदी होत होती. पण त्यावर सध्या बोलायचे नाही. कारण त्या विभागाचे मंत्री उपस्थित नाहीत. २०२४-२५ पासून खरेदी सुरू केली. त्यानंतर दुसरं महामंडळ आणलं. हाफकिन जे करत होतं, तेच हे महामंडळ करत असेल तर उपयोग काय? हाफकिनला पर्याय म्हणून प्राधिकरण सुरू केले. या प्राधिकरणानेही फक्त २३ टक्के निधी खर्च केला. राज्यातील बऱ्याच रुग्णालयांमध्ये औषधी पोहोचली नाही. परिणामी अनेक मृत्यू झाले. यासाठी सरकारला जबाबदार धरायचे नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Eknath Shinde : ५० खोके नव्हे, तर ३ हजार खोके दिले!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, औषधं मुबलक आहेत, असं सरकारकडून सांगितलं जातं. पण हॉस्पीटलमध्ये गेल्यावर तेथे औषधे मिळत नाहीत, हे वास्तव आहे. या प्रश्नाकडे कुठल्या पक्षाच्या आमदाराने प्रश्न उपस्थित केला, या दृष्टीने बघू नये. कारण आपल्या सर्वांना भेडसावणारी ही समस्या आहे. त्यामुळे सारासार विचार करून यावर उपाय काढावा.