Now stability will be established, Chandrashekhar Bawankule is confident. : सर्व ग्रामसभांमध्ये अभिनंदनाचा ठराव पारित केला जाईल
Nagpur : जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय काल (३० एप्रील) केंद्र सरकारने जाहिर केला. तेव्हापासून ओबीसी, मराठा आणि इतर संघटनांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. विरोधक टीका टिप्पणी करत असले तरी सत्ताधारी आनदोत्सव साजरा करत आहेत. केंद्र सरकारच्या कालच्या निर्णयामुळे राज्यातील अस्थिर वातावरण संपेल आणि स्थिरता निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
नागपुरात आज (१ मे) सकाळी पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, जातिय जनगणनेच्या मागणीसाठी ओरडणाऱ्यांपैकी आज एकही नेता केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी पुढे आलेला नाही. कुठे गेले ते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार? आज मी जर दुसऱ्या पक्षात असतो तरीही केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी पुढे सरसावलो असतो.
Prakash Ambedkar : केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत खोटारडेपणा केला. त्यांनी १९४८ पासून कधीही जातीय जनगणनेचा विचार केला नाही. ओबीसी समाजाची, खुल्या जातींची जनगणना का केली नाही? आज समाजात एक करोडपती आहे, तर एक कमजोर आहे. समाजातील कमजोर व्यक्ती शोधून सामाजिक समता निर्माण करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जाईल, असे महसून मंत्री म्हणाले.
Dr. Pankaj Bhoyar : पाण्याच्या कारणाने होणारे स्थलांतर थांबवा!
महाराष्ट्रातील १ लाख १८० बुथवर भाजपच्या कमिट्या आहेत. त्या सर्व कमिट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करतील. जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल १२०० मंडळसुद्धा हा ठराव पारित करतील. आमच्या मित्रपक्षांनाही आम्ही विनंती करणार आहोत की, त्यांनी सर्व ग्रामसभांमध्ये पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करावा, असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.