Breaking

Chandrashekar Bawankule: ‘ते’ भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलता

Bawankule on Uddhav Thackeray, keep making fun:बावनकुळेनी उद्धव ठाकरेंना सुनावले, तुम्ही गरळ ओका, टिंगल- टवाळी करा, टोमणे मारत रहा

Mumbai: उबाठा गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच त्यांनी केलं.उद्धवजी, तुम्ही अशीच गरळ ओकत रहा, टिंगल- टवाळी करीत रहा, टोमणे मारीत रहा. तुमचे पुढील आयुष्य यातच जाणार आहे. अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावले आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. शिंदे गट भाजपला मिळाल्यापासून शिवसेनेच्या रडारवर भाजप आणि भाजपचे नेते कायम असतात. त्यावर उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना जोरदार हल्ला चढवत राहते. कालच्या भाषणाचा संदर्भ घेऊन बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना चांगले सुनावले आहे त्यांनी म्हटले आहे की, ‘ शिवसेना संपली नाही’ म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात.

Amravati Municipal Corporation : महापालिकेला दरवर्षी १० कोटींचा फटका; मोबाईल टॉवर, भूमिगत केबलवर कर आकारता येणार नाही

आदरणीय मोदी, शहा, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे, पण हे नेते जेव्हा देशभर,राज्यभर दौरे करत होते, तेव्हा ते मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे.जे ‘मुंबई आमची’ म्हणतात, त्यांनी आधी सांगावं की, मुंबईतल्या मराठी माणसाचं काय केलं? महापालिकेत सत्ता असतानाही त्यांच्या झोपड्या, पाण्याच्या योजना, शिक्षण, आरोग्य यावर काही केलं का?

मुंबईकरांसाठी कोस्टल रोड, मेट्रो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, झोपडपट्टी पुनर्वसन योजना या फडणवीस यांच्या पुढाकारानं झाल्यात हे मुंबईकरांना माहित आहे. मुंबई आमची आहे, हे तुम्ही ओरडून सांगत राहा, पण विकास, सुरक्षितता आणि सन्मान हवा असेल, तर मुंबईवर भाजपा- महायुतीचाच झेंडा फडकला पाहिजे हीच मुंबईकरांची इच्छा आहे!

Soumya Sharma : नव्या आयुक्तांच्या नेतृत्वात होणार अमरावती महापालिकेची निवडणूक!

तुम्ही अशीच गरळ ओकत रहा, टिंगल- टवाळी करीत रहा, टोमणे मारत रहा. तुमचे पुढील आयुष्य यातच जाणार आहे. लोकसेवा आणि लोककल्याणासाठी मनात तळमळ असावी लागते, ती तुमच्यात नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला यापूर्वीच कळलेली आहे. आता पुढील निवडणुकांमध्ये जनता त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.असेही बावनकुळे यांनी सुनावले आहे.