Breaking

Chandrashekhar Bawankule Ashish Jaiswal : पैसे घेतल्याशिवाय अधिकारी कामच करत नाहीत

Officials do not work without taking bribes : बावनकुळे-जयस्वालांनी घेतले फैलावर; सचिवांकडे केली तक्रार

Nagpur राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. त्यांची थेट सचिवांकडेच तक्रार केली. अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नसल्याचा दावा दोघांनीही केला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण सभेत आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (मजीप्रा) अधिकारी पैसे घेतल्याशिवाय तांत्रिक मंजुरीच देत नाहीत. हा मुद्दा मुद्दा उपस्थित केला. तांत्रिक मंजुरीसाठी नगर पालिकेला एक-एक लाख रुपये द्यावे लागत असल्याचा थेट आरोपच केला. यामुळे एकच खळबळ उडाली.

Mahatma Gandhi : १ फेब्रुवारीला सेवाग्राम आश्रमात येणार होते बापू!

दुसरीकडे पालकमंत्री बावनकुळे यांनी नगर पालिका, नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनाच उभे केले. पैशाची मागणी होते का, असा प्रश्न केला. सीओंनी मात्र यावर काहीच उत्तर दिले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी थेट खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना फोन लावला. त्याचप्रमाणे खात्याच्या प्रधान सचिवांनाही फोन करून कारभाराची माहिती दिली. यावर अंकुश बसविण्याची सूचना केली.

खासदार श्यामकुमार बर्वे यांनीसुद्धा नगरपालिकेच्या सीईओंच्या कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर खुद्द पालकमंत्री बावनकुळे यांनी नगरपालिकेच्या सीईओंंना धारेवर धरले. ‘एका कामासाठी कंत्राटदाराला ३५ टक्के कमिशन सीओंना द्यावे लागते. हा प्रकार योग्य नाही. तुमची एसीबीत तक्रार करण्यात येईल. शिवाय मालमत्तेची तपासणी करू’, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

Sudhir Mungantiwar : भारताच्‍या सर्वसमावेशक विकासाचा संकल्‍प

विविध विभागांतील अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही खडसावले. एसडीओ, तहसीलदार मुख्यालयी राहत नाहीत. आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही. तुमचा वचक नाही. अशाने कसे चालणार, हे खपवून घेतले जाणार नाही. कुणीही तुम्हाला वाचवणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. प्रसंगी तुमच्या सेवा पुस्तिकेतही नोंद करायला मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले. मनपा आयुक्त व नासुप्र सभापती यांनाही खडेबोल सुनावले.