Half of the CCTVs in Nagpur city are off : नवीन कॅमेरे बसविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
Nagpur सुरक्षिततेच्यादृष्टीने नागपूर महानगरात विविध ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेराचे जाळे निर्माण केले. सुमारे ४ हजार कॅमेरे स्मार्ट सिटी अंतर्गत आपण लावले. सद्यास्थितीत यातील २ हजार कॅमेरे सुरू असून उर्वरित नादुरुस्त झालेल्या कॅमेरांना काढून नवीन कॅमेरे बसविण्यासाठी व ऑप्टीक फायबर केबलसाठी निधी उपलब्ध करू, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावननकुळे यांनी सांगितले.
सुरक्षिततेच्यादृष्टीने वाढत्या महानगराचा विचार करून काही ठिकाणी नवीन पोलिस चौक्या द्याव्या लागणार आहेत. कामठीसाठी पोलिस विभागाचा स्वतंत्र झोन-६ आवश्यक झाला आहे. याबाबत परिपूर्ण प्रस्ताव येत्या सात दिवसात सादर करण्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर सदर कॅमेराबाबत वस्तुस्थिती दर्शक अहवाल एक आठवड्यात सादर करण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.
नागपूर महानगरात रोजगाराला चालना देणारी अनेक उद्याने बंद अवस्थेत आहेत. अंबाझरी व इतर उद्यानाबाबत जे काही वाद असतील अथवा जो काही भाग न्यायप्रविष्ठ असेल तेवढा वगळून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या असलेल्या उद्यानाचा वापर करता आला पाहिजे. त्यांना यात पायी फिरण्यासाठी सुविध उपलब्ध होईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी अंबाझरी तलाव उद्यानासह इतर उद्यान खुले करण्यास सांगितले.
काटोल, कळमेश्वर, नरखेड तालुक्यातील भूजल पातळी ८०० फुटाच्या खाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करणे आव्हानात्मक झाले आहे. कृषी क्षेत्रासाठी सौर ऊर्जेच्या पंपांचा शासन निर्णय असल्याने एवढ्या खोलवरून पाणी सौर पंपाद्वारे उपसणे शक्य नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात सौर पॅनल व अधिक एचपीची मोटर लागत असल्याने या तीन तालुक्यासाठी सौर पंपाच्या शासन निर्णयाचा पुर्नविचार करू असे बावनकुळे म्हणाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते.
Zilla Parishad school : भाजप आमदाराने भूमिपूजन केलेल्या शाळेच्या फलकाला काळे फासले
सुरक्षाही वाऱ्यावर
नागपूर शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. अश्या परिस्थितीत गुन्ह्यांचा छडा लावणे नागपूर पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे CCTV हा तपासात महत्त्वाचा दुवा ठरतो. पण सध्या CCTV यंत्रणाच ढेपाळल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहराची सुरक्षदेखील वाऱ्यावर आहे.