Minister warns government employees : त्रास झाल्यास थेट तक्रार करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा
Amravati “सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकातील नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा. मात्र, त्यात अडथळे निर्माण करणाऱ्या कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असा ठाम इशारा राज्याचे महसूलमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
नागरिकांना तहसील कार्यालयात होणाऱ्या त्रासाची दखल घेत त्यांनी प्रशासनाला कडक शब्दांत सूचित केले की, यापुढे कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनी त्रास झाल्यास माझ्या वैयक्तिक मोबाईलवर थेट तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
MNREGA workers : वेतन देता येत नसेल तर भीक द्या’; मनरेगा कामगारांच्या भावनांचा उद्रेक
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत वरूड येथील तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे अध्यक्षस्थानी होते. आमदार उमेश यावलकर, नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, डॉ. मनोहर आंडे, बाळासाहेब सोलव, गोपाल मालपे, नीलेश फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय हयगय खपवून घेतली जाणार नाही
“महसूल कार्यालयांमध्ये नागरिकांच्या तक्रारी वेळेवर निकाली लागत नाहीत, ही बाब गांभीर्याने घेतली आहे. यापुढे प्रशासकीय हयगय, विलंब किंवा टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड इशारा ना. बावनकुळे यांनी यावेळी दिला. सरकारच्या योजनांचा लाभ घरोघरी पोहचवण्यासाठी महसूल विभागाने हे अभियान सुरू केले असून, नागरिकांना महसुली प्रमाणपत्र, ७/१२ उतारा, जात, उत्पन्न प्रमाणपत्रे मिळवणे सोयीचे व्हावे, हा हेतू आहे.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कृषी, पंचायत समिती, वीज वितरण, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“टेबल टू टेबल” काम करणारे आमदार दुर्मिळ – बावनकुळे
“वरूड-मोर्शी तालुक्यातील प्रश्नांचे गांभीर्य आमदार उमेश यावलकर सातत्याने अधोरेखित करत आहेत. पहिल्या तीन महिन्यांतच त्यांनी विधानसभेत तब्बल ४५ प्रश्न उपस्थित केले. ‘टेबल टू टेबल’ जाऊन नागरिकांचे काम लावून देणारा असा कार्यक्षम आमदार मी फारच कमी पाहिला आहे,” अशा शब्दांत बावनकुळे यांनी आमदार यावलकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
Crime in Akola : पत्नी व सावत्र मुलीचा गळा आवळून खून केला, नंतर मृतदेहांना घास भरवला
शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न २०२९ पर्यंत मिटणार
“राजस्व योजनेतून ‘जिवंत सातबारा’ योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक शेतापर्यंत पाणंद रस्ते, १२ तास दिवसा वीज, मोफत शेती वीज, मुख्यमंत्री सौर वीजवाहिनी अशा योजना २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रात्रीच्या सिंचनाचा प्रश्न कायमचा मिटणार आहे,” असेही ना. बावनकुळे यांनी जाहीर केले.
थेट संपर्कासाठी मोबाईल क्रमांक दिला
कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना महसूलमंत्र्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक सार्वजनिक करून नागरिकांना थेट तक्रारी करण्याचे आवाहन केले. “तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात अडथळा येत असेल, सेवा वेळेवर मिळत नसेल, तर थेट मला कळवा. तुमच्या तक्रारीवर मी स्वतः लक्ष ठेवीन,” असे आश्वासनही त्यांनी दिले.