Breaking

Chandrashekhar Bawankule : सरकार जर वाळू विकायला लागली तर कसे होईल ?

 

Revenue Minister Chandrashekhar Bawankule’s response to the discussion regarding sand mafia : वाळूमाफिया संदर्भातील चर्चेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

Mumbai : वाळूमुळे समाजात गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वाळू ही समाजाला लागणारी गोष्ट आहे. पण यामध्ये तहसीलदार आणि पोलिसांचे हप्ते बांधलेले आहेत आणि माफिया राज सुरू झाला आहे. वाळू घाट आणि ग्राहक यांच्यामधील कडी काढल्यास माफिया संपून जातील, ही बाब विधानसभेत सदस्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली.

गोदावरीच्या घाटावर आणि इतरही वाळू घाटांवर सरकारने आपले लोक बसवून थेट वाळुची विक्री करावी. सध्या तहसीलदार, पोलिस यांचे हप्त बांधलेले आहेत. सरकारचे माणसं बसवल्यास आणि जाग्यावरून वाळू विकल्यास ३५ ते ४० हजार कोटीचा दरवर्षी महसूल वाढेल. नदीकाठांवरून जो वाळू उपसा केला जातो. त्यामध्ये माफिया तयार झाले आहेत. दहशत निर्माण झाली आहे. खूनही झाले आहेत. अधिकाऱ्यांवर ट्रक चढवण्याचेही प्रकार आपण पाहिले.

गंभीर घटना घडुनही कठोर कारवाई होत नाही. गुंड प्रवृत्तीचे लोक यामध्ये सहभागी आहेत. महसूल आणि पोलिस विभागाने मिळून असे लोक ब्लॅक लीस्ट केले पाहिजे. सामान्य लोकांना नदीकाठावर जाणे कठीण झाले आहे. गावांतील लोक दहशतीमध्ये वावरत आहेत. याशिवाय विदर्भात कोळशाच्या खाणी आहेत. ओपनकास्ट खाणीमध्ये कोळशापर्यंत जाण्यासाठी २०० ते २५० मिटर मातीचे खोदकाम करावे लागते. यामध्ये मातीसोबत वाळुही निघते.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा आपल्या मतदारसंघासाठी मोठा निर्णय

या ओव्हरबर्डनचे ढिगारे लावले जातात. हे ढिगारे येवढे मोठमोठे असतात की त्याचे पहाड तयार झाले आहेत. या ओव्हरबर्डनमधून रेती मिळू शकते. मुंबईत समुद्र किनाऱ्यावर वाळू चोरी करण्याचे काम अविरत सुरू आहे. किनारे चालण्यायोग्य राहिले नाही. हे किनारे पुर्ववत करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, अशा सूचना सदस्यांनी सभागृहात केल्या.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी ठणकावले, तक्रार आली तर पोलीस कारवाई करेन

या चर्चेमध्ये प्रशांत बंब, रोहित पवार, जयंत पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम, डॉ. आशिष देशमुख, असलम शेख या सदस्यांनी यांनी सहभाग घेतला. यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सरकार जर वाळू विकायला लागली तर कसे होईल? आपल्याला इतरही कामे असतात. प्रशांत बंब यांनी वाळू धोरण वाचावे आणि त्यात सुधारणा सुचवावी. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. समुद्रकाठावरील वाळू चोरीच्या बाबतीत कोकण आयुक्तांना सुचना दिल्या आहेत. वाळू खेचणारे पंप काढायला सांगितले आहे. जर नाही काढले तर पंप लावणार्यांवर गुन्हे दाखल करणार आणि तहसीलदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.