1071 MW project to be set up for three lakh farmers in Maharashtra : मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० लवकरच होणार कार्यान्वीत
Mumbai : पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून, कार्बन उत्सर्जन कमी करून सौर ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० लवकरच कार्यान्वीत करण्यात येत आहे. GEEP तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा उपयोग करून मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्रात शाश्वत विकासाला चालना देणे, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
महानिर्मितीतर्फे सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत १०७१ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प येत्या काळात कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महानिर्मीती ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची सूत्राधारी कंपनी सुमारे १३,८८० मेगावॅट क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या राज्य विद्युत उत्पादकांपैकी एक आहे. नॅशनल थर्मल पॉवर कंपनी नंतर ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची राज्याच्या मालकीची जनरेशन कंपनी आहे.
Devendra Fadnavis : मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना मूळ विभागात जाण्यासाठी अल्टिमेटम
औष्णीक, वायू, जल विद्युत आणि सौर असे ऊर्जा उत्पादन क्षेत्रात वैविध्य असलेली महानिर्मिती ही कंपनी नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प सुरू करत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना कमी दरात वीज पुरवठा करून कार्बन उत्सर्जनात घट होण्यास मदत होणार आहे. या वर्षीपर्यंत सुमारे ३० टक्के फिडरचे सोलरायजेशनचे उद्दिष्ट मिशन २०२५ म्हणून निश्चित करण्यात आले आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५ ते १० किलोमीटर परिघाच्या परिसरात विकेंद्रित सौर प्रकल्प उभारले जातात.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अकोला जिल्ह्याला किती फायदा?
GEEP इंडिया हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रकल्प मॉनिटरींग युनिट आणि एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करत आहे. यामुळे माहितीचे संकलन, या प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रकल्पांचे सुलभ व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. GEEP च्या तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा उपयोग करून शाश्वत विकासाला चालना देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.