Breaking

Churmura Grampanchayat : पाणी द्या, नाहीतर फाशी घेतो; गावकऱ्यांनी उपसरपंचांना कोंडले

Villagers angry due to water shortage : गावकऱ्यांचा संताप; पाणी टंचाईच्या झळा असह्य

Yavatmal भर उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा प्रत्येक गावात जाणवत आहेत. उमरखेड तालुक्यातील चुरमुरा गावात मंगळवारी पाणीटंचाईचा उद्रेक झाला. यावेळी पाणीटंचाई विषयावर उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना गावकऱ्यांनी कोंडले, तर काही ग्रामस्थांनी स्वतःला फाशी लावून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाणी द्या असे म्हणत चुरमुरा गावातील नागरिकांनी मंगळवारी संताप नोंदविला.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह उपसरपंच व सदस्यांना गावकऱ्यांनी कोंडून ठेवले. दरम्यान, आंदोलनातील काही जणांनी ग्रामपंचायत कार्यालय आवारात फाशी घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल पाच तास चाललेले आंदोलन गावकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी देऊ असे ग्रामपंचायतीने आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. चुरमुरा गावात गत तीन वर्षांपासून जल जीवन मिशन योजनेची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाली आहेत. मुबलक पाण्याची विहीर उपलब्ध आहे. गावात पाइपलाइन टाकण्यात आली आहे. मात्र, मोटारपम्प नाही.

Local Body Elections : कुणाची संधी हुकली; काहींना पुन्हा लॉटरी!

यासंदर्भात सरपंच आणि सचिवांना गावात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार सूचना दिल्या. मात्र, कुठल्याही उपाय योजना झाल्या नाही. यामुळे आज ही वेळ आली. येत्या सहा दिवसांत चुरमुरा गावातील पाण्याचा प्रश्न सुटेल. यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा कुठलाही सामना करण्याची वेळ येणार नाही, असे सांगण्यात आले. मोटर पंप बसवून पाणी सुरू करता येत असतानादेखील ठेकेदारांनी योजना प्रलंबित ठेवली.

याचा फटका गावकऱ्यांना बसला आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पाण्याच्या घागरी ग्रामपंचायतीमध्ये फेकल्या. यामुळे वातावरण अधिक तापले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी गटविकास अधिकारी कोळपे यांच्याशी संपर्क साधला.

Tension in Gondia : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला, धार्मिक भावना दुखावल्या!

मात्र, आपल्या ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मुंडे यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. यावेळी विस्तार अधिकाऱ्यांनी सहा दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, झालेल्या प्रकाराबाबत उपसरपंच अर्जुन जाधव यांनी प्रशासनातील अधिकारी याला कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.