Breaking

CM Devendra Fadnavis : ‘महाज्योती’तर्फे पाच जिल्ह्यांमध्ये Excellence Centres

Aims to train students in various fields : पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचा समावेश

Mumbai महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशीप सारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती या संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र Excellence Centres स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार, दि. १३ जानेवारी) सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. ‘विभागामार्फत विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळा चालविण्यात येतात. विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गुणवत्तेचे शिक्षण डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यासाठी डिजिटल क्लास रूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

CM Devendra Fadnavis : सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा !

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) धर्तीवर विमुक्त जाती व भटक्या जमाती करीता सीड अंतर्गत (Scheme for Economic Empowerment of DNT’S) घरकुले बांधण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरीता वेब पोर्टलची निर्मिती तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिलेत.

Workers get diarrhea due to contaminated water : दूषित पाण्यामुळे शंभर कामगारांना अतिसाराची लागण

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या कर्जाची मर्यादा वाढविण्याबाबतही प्रस्ताव तयार करावा. मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा. इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे सुरु करावी. याबाबत जागा उपलब्ध होण्यासाठी मुख्य सचिव यांच्याकडे संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.