Breaking

CM Devendra Fadnavis : सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा !

Establish a permanent mechanism for procurement of soybeans : मुख्यमंत्र्यांचे आदेश; पणन विभागाच्या १०० दिवसांचा घेतला आढावा

Mumbai दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हावी. यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.

समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारण्यात यावेत. समृध्दी महामार्गालगत उभारण्यात येणारे ऍग्रो हब, मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभी करावे. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ऍग्रो हबसाठीचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

MSRTC : एक समुपदेशक अख्ख्या जिल्ह्यात फिरतो!

नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी पुढील वर्षी ऑक्टोबरमध्येच पूर्ण करा. शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी. राज्यातील चारही विभगात उभारण्यात येणाऱ्या ऍग्रो लॉजिस्टिक हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जास्त मागणीही आहे. त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुंबई येथे महाबाजार!
पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबई येथे महाबाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे.

CM Devendra Fadnavis : शक्तीपीठ महामार्गाचे काम पुन्हा सुरू होणार !

बाजार समित्यांचे वर्गीकरण
कोकण भागात माशांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. राज्यातील १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी, अडीच कोटी ते पाच कोटी, पाच ते दहा कोटी, दहा ते पंचवीस कोटी असे उपावर्गिकरण करणार. छ. संभाजी नगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ऍग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या ४५ दिवसात त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.