Breaking

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, ‘वाद नाहीत तर संमेलन कसले!’

The Chief Minister commented on the controversies in literature meetings : दावोसमध्ये चिमुकला म्हणाला, ‘मी पुन्हा येईन’

Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात साहित्य विश्वाला चिमटाही घेतला. संमेलन कुठलेही असो वाद होतोच. अखिल भारतीय असो किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन असो. वादाशिवाय रंगत नाही. पण वादाचे रुपांतर संवादात व्हावे, विसंवादात होऊ नये, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

दाओस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा उल्लेख करत त्यांनी ‘मी पुन्हा येईन’चा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘दावोसला गेलो असता तेथील एका चिमुरड्याने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे सुंदर गीत गायले. मराठी माणूस इतक्या वर्षापासून परदेशात गेला तरी माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही, हे बघून अभिमान वाटला. ते गीत गाऊन झाल्यानंतर त्या मुलाने लगेच ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले आणि मला आश्चर्यच वाटले.’ मात्र विश्व मराठी साहित्य संमेलन पुढे जेव्हा आणि जिथे होईल, तेव्हा ‘मी पुन्हा येईन’ असा शब्द देतो, अशी मिष्किलीही त्यांनी केली.

Guardian Minister Sanjay Rathod : यवतमाळचे शिक्षण क्षेत्र राज्यात ठरेल ‘मॉडेल’

या कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही भाषणं झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संमेलनाच्या आयोजनावरून होत असलेल्या वादावर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘दिल्लीमध्ये अखिल भारतीय संमेलन फेब्रुवारीत होत असताना या संमेलनाची गरज काय, असा प्रश्न लोक विचारत होते. यावरून वाद निर्माण करण्यात आला. पण सगळे साहित्याचे वारकरी आहेत. कुणी आळंदीला जातात कुणी पंढरीला. काय फरक पडतो आयोजन झाले तर?’

Goa CM Dr. Pramod Sawant आदिवासींचे जीवनमान उंचावण्यास नवी दिशा मिळेल

अजित पवार यांनी दिल्लीतील मराठी शाळांना पाठबळ देण्याचा मुद्दा छेडला. देशाची राजधानी दिल्ली येथे असलेल्या मराठी शाळांना पाठबळ दिले पाहिजे. त्या पुन्हा नव्याने उभ्या झाल्या पाहिजेत. दिल्लीतील मराठी कुटुंबांमधील पुढच्या पिढीची भाषेशी नाळ जुळून राहण्याकरिता ते आवश्यक आहे. त्यादृष्टीने दिल्लीतील मराठी शाळांना आर्थिक मदत करण्याची तरतूद करावी, अशी सूचना मला मुख्यमंत्र्यांनी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.