Use digital technology for planning Nashik’s Simhastha Kumbh Mela : नाशिकच्या कुंभसाठी Digital नियोजन, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Mumbai प्रयागराज येथील महाकुंभ आटोपला. आता राज्य सरकार दोन वर्षांनी नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला लागले आहे. या कुंभमेळ्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजन करा. अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांनी दिले. विशेष म्हणजे प्रयागराज येथील महाकुंभच्या नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारचे एक पथक देखील गेले होते.
त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ Digital Technology Kumbh म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती.
Zilla Parishad Nagpur : रिकाम्या खुर्च्यांवर शिक्षण विभागाची जबाबदारी!
स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण तयार करावे. यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा. कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार केला होता. मात्र, प्रयागराजमधील महाकुंभसाठी झालेली गर्दीची परिस्थिती पाहता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
रस्ते असावे उत्तम
प्रयागराज येथे कोट्यवधी लोक पोहोचू शकले, याचे श्रेय सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना देण्यात आले. त्यांनी देशाच्या सर्व भागांमधून प्रयागराजला पोहोचणारे रस्ते अतिशय उत्तम केलेत, त्यामुळे ही सोय झाली, असे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहरातील व त्र्यंबकेश्वरला जाणारे रस्ते उत्तम करण्याचे निर्देश दिले. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता २४ मीटर वाढविण्यात यावा. तसेच या रस्त्यांच्या कडेला टेंट सिटी उभारण्यासंदर्भातही विचार करावा, असे सांगण्यात आले. सिंहस्थसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे, असं मुख्यमंत्री म्हणाले.